डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

प्रशिक्षणसाठी घाईघाईने जाणाऱ्या 30 शिक्षकांच्या वाहनाचा अपघात|educational-news-shaikashnikbatmi-teachersjob|

 टँकरची बसला धडक, 30 शिक्षक जखमी, गॅस गळतीनंतर आगीचा भडका; मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये भीषण अपघात...

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी खासगी बस एलपीजी टँकरच्या जोरदार धडकेने 30 फूट खोल दरीत कोसळली. यात बसमधील 30 शिक्षक आणि चालक असे 31 जण जखमी झाले असून त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

रत्नागिरीजवळील निवळी-बावनदी घाटात रविवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. अपघातग्रस्त टँकरमधून गॅसगळती झाल्याने आगीचा भडका उडाला. त्यात दोन घरे खाक झाली तर दोन वाहनेही जळाली. अपघातानंतर महामार्ग 9 तास ठप्प होता. वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी लगतचा परिसर रिकामा केला.



शिक्षक प्रशिक्षणासाठी बसने रत्नागिरीत येत होते. सकाळी आठच्या सुमारास बावनदी येथील रस्त्यावर बसला मागून भरधाव येणाऱया टँकरने धडक दिली. त्यात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 30 फूट खोल दरीत कोसळली, तर टँकर पलटी झाला. एलपीजी टँकर जयगड येथून मुंबईकडे चालला होता. बावनदीच्या अलीकडील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या खासगी बसला टँकर धडकला. खासगी बसमधून प्रवास करणारे 15 शिक्षक आणि 16 शिक्षिका असे एकूण 31 जण अपघातात जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोन जखमी महिला प्रवाशांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

पाली, संगमेश्वरमार्गे वळवली वाहतूक 

एलपीजी टँकर रस्त्यावर पलटी झाल्यानंतर गॅस गळती होऊन परिसरात आग लागली. त्यात काही झाडे व रिकामी घरे जळाली. गॅस गळतीचे वृत्त समजताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः हजर राहून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. यादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. येथील वाहतूक पाली आणि संगमेश्वरमार्गे वळवण्यात आली.

जखमींची नावे

अमोल कोतवाल, राजेश यादव, धर्मेंद्र देरुगडे, दिलीप डोंगरे, संकेत जागुष्टे, कमल महाडिक, विराज सावंत, निशिकांत वानरकर, मंदा खाडे, वृषाली यादव, श्वेता चव्हाण, स्मिता पाटील, जयश्री गावडे, मीना घाडगे, नेहा मेस्त्री, मनीषा कांबळे, प्रियांका जाधव, रुपाली भुवड, उषा खुडे, नीता बांद्रे, हर्षाली पाकळे, सुलक्षणा पाटील, मालिनी चव्हाण आणि मिता शिरकर अशी जखमींची नावे आहेत.

प्रशिक्षण मधील सक्ती   ; शिक्षक संघटनेचा आरोप

प्रशिक्षणाला वेळेपूर्वी हजर राहण्यासाठी घाईने येणाऱया शिक्षकांच्या गाडीला निवळी बावनदी येथे अपघात झाला. या अपघाताला शिक्षण विभाग जबाबदार आहे. प्रशिक्षणास हजर राहण्यास पाच मिनिटे उशीर झाला तरी शिक्षकांना प्रशिक्षणातून बाहेर काढले जाते. प्रशिक्षण तालुकास्तरावर घेण्यास प्रशासनाचा नकार होता. त्यामुळे प्रशिक्षणाला लवकर पोहोचण्यासाठी शिक्षकांना खासगी बसने प्रवास करणे भाग पडले, असा आरोप कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी व रत्नागिरी जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी केला.

रखडलेल्या महामार्गावर चाकरमान्यांची रखडपट्टी, माणगावात वाहनांच्या रांगा 

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात गेलेले चाकरमानी येत्या 16 जूनपासून मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने मुंबईत परतत आहेत. या परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे चाकरमान्यांची जागोजागी रखडपट्टी होत आहे. महाड ते वडखळदरम्यान महामार्गाचे बरेचसे काम अर्धवट स्थितीत पडले आहे. कोलाड येथील पुलाचे काम मागील काही वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. त्यामुळे या परिसरात शनिवारपासून मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. रविवारीही वाहतूककोंडीचा मनस्ताप वाहनचालकांना सोसावा लागला.

महामार्गाच्या जागोजागी रखडलेल्या कामांमुळे चाकरमान्यांचा कोकण ते मुंबई प्रवासातील वेळ चार ते पाच तासांनी वाढला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 13 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. अजूनही ते पूर्ण झालेले नाही.


शिक्षक बदली संवर्ग १ व २ बाबत महत्त्वाचे....

संवर्ग 1 व 2 बदली साठी नोंदणी प्रक्रिया|online-transfer-howtofillform|

 संवर्ग 1 व 2 बदली साठी नोंदणी  प्रक्रिया




*संवर्ग भाग 1 आणि संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा*


👇🏼


https://ott.mahardd.com/


*Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा*


*आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा*


*मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 8 ऑप्शन दिसतील.*

*त्यापैकी आपण Intra District (जिल्हाअतंर्गत) या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील Application (अर्ज) हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा*


*Open होणाऱ्या पेजवर आपणास* 

*1) संवर्ग भाग 1 अर्ज करा* 

(Apply Cadre 1)


*2) संवर्ग भाग 2 अर्ज करा* 

(Apply Cadre 2)

*असे दोन टॅब दिसतील*

*ज्या शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये आपली नोंदणी करायची आहे त्यांनी 👉🏼संवर्ग भाग 1 अर्ज करा त्यावर क्लिक करा*


*अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल . असे disclaimer दिसेल त्या disclaimer च्या बाजूच्या बॉक्समध्ये टिक करा*


*त्याखाली आपणास आपले नाव ;आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल* 


*त्याखाली आपणास "बदलीतून सूट हवी आहे काय" हा टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करा*

*क्लिक केल्यानंतर त्याखाली Yes व No हे दोन ऑप्शन दिसतील*


*जर आपणास बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजेच बदली करायची नाही अशा शिक्षकांनी Yes वर क्लिक करावे आणि ज्या शिक्षकांना बदली करायची असेल त्यांनी No वर क्लिक करावे*

*(या ठिकाणी लक्षपूर्वक Yes आणि No ऑप्शन निवडा येथे चुका होऊ शकतात)*

*त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा या टॅब वर  क्लिक करा त्यानंतर आपणास, "self" व  "Spouse" असे दोन ऑप्शन दिसतील जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर "self "आणि जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर "Spouse" निवडा आपण drop down मध्ये जाऊन आपला संवर्ग 1 मधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा (self मध्ये एकूण1 ते 14 उपप्रकार असतील Spouse मध्ये 15 ते 20 उपप्रकार असतील)* 


*(Yes ऑप्शन आपण निवडले तर आपले नाव पुढील कोणत्याही यादीमध्ये येणार नाही आणि No ऑप्शन निवडल्यास जर आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास आपली बदली पुढील संवर्गातून होऊ शकते)*


*आपण भरलेले दोन्ही ऑप्शन पुन्हा चेक करा व त्यानंतर खालील Submit  या बटन वर क्लिक करून आपली माहिती Submit करा* 


*Submit वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओटीपी मागितल्या जाईल तो ओटीपी टाका व त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केल्या जाईल*


*अशाप्रकारे संवर्ग 1 चे शिक्षक आपला फॉर्म नोंदणी मोबाईल वरून करू शकतात*


ग्राम विकास विभागाचे विन्सीसला आदेश | teachers-transfer-ottmahardd-online|

कोर्ट निकालानुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदलीमध्ये संवर्ग-३ मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देणेबाबत.... ग्राम विकास विभागाचे विन्सीस ला आदेश


मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.

               

विषय :- रिट याचिका (स्टॅम्प) क्र. १६२१२/२०२५ व १६२२४ मध्ये मा. न्यायालयाने दि.३०.५.२०२५ रोजी व रिट याचिका (स्टॅम्प) क्र. १६२३६/२०२५ व १६२३५/२०२५ मध्ये दि.२.६.२०२५ दिलेल्या निकालानुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदलीमध्ये संवर्ग-३ मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देणेबाबत.

           

संदर्भ :- शिक्षणाधिकारी (प्राथ), जि. प.छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र. जिपछसं/शिक्षण/प्रावि-२/२०२५/११३६, दि.२.६.२०२५.


महोदय,


उपरोक्त विषयाबाबत शिक्षणाधिकारी (प्राथ), जि. प.छत्रपती संभाजीनगर यांनी संदर्भाधिन पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका (स्टॅम्प) क्र.१६२१२/२०२५ व १६२२४ मध्ये मा. न्यायालयाने दि.३०.५.२०२५ व रिट याचिका (स्टॅम्प) क्र. १६२३६/२०२५ व १६२३५/२०२५ मध्ये दि.२.६.२०२५ रोजी दिलेल्या न्याय-निर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यामध्ये संवर्ग-३ मधुन बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी आपणांस विनंती आहे. तसेच मा. न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेश पहा.....




         

वेतनश्रेणी व इतर अनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत शासन आदेश दिनांक २/६/२०२५|shashnnirnay-gr-vetantruti|

 वेतन त्रुटी निवारण समिती-२०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत.     


प्राथमिक पदवीधर शिक्षकावरील अन्याय दूर                                     वेतन त्रुटी निवारण समिती -  2024 च्या अहवालातील वेतनश्रेणी व इतर अनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत शासन आदेश दिनांक - २/६/२०२५

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त दि. ३० जानेवारी, २०१९ च्या शासन अधिसूचनेन्वये दि. १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्यात आली आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू केल्यानंतर वेतननिश्चिती व सुधारीत वेतनश्रेणीच्या अनुषंगाने काही त्रुटी निदर्शनास आल्या. तसेच सातव्या वेतन आयोगात प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत निर्माण झालेल्या त्रुटीच्या अनुषंगाने राज्यातील अनेक शिक्षकांनी मा. उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका क्र. १३०३१/२०२२. १३०३२/२०२२, ११५१८/२०२२. ११५१९/२०२२, १७३५/२०२३, १३०३३/२०२२, १०४९५/२०२२, १०४९६/२०२२, १०४९७/ २०२२, ५०४९८/२०२२ यांची एकत्रित सुनावणी झाली. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करुन शिफारशी करण्याकरीता वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक वेपुर -११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि. १६ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयानुसार श्री. मुकेश खुल्लर,  सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ स्थापन करण्यात आली होती. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व अपर मुख्य सचिव (व्यय), वित्त विभाग हे या समितीचे सदस्य होते. समितीने आपला अहवाल शासनास दि.३१ डिसेंबर, २०२४ रोजी सादर केला आहे. सदर अहवालातील शिफारशींवर निर्णय घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषंगाने सदर अहवाल मा. मंत्रीमंडळापुढे सादर करण्यात आला होता. मा. मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :-             

शासनाने वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ ने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीं संदर्भात निर्णय घेतले आहेत. समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा तपशिल सोबतच्या जोडपत्र १ ते ३ मध्ये नमूद करण्यात आला आहे.

तसेच जोडपत्र १ मध्ये नमूद केलेले सुधारित वेतन स्तर दि. १ जानेवारी, २०१६ पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभ दि.१ जून, २०२५ पासून देण्यात यावेत, मात्र दि. १ जानेवारी, २०१६ पासून दिनांक ३१ मे, २०२५ पर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारशींमुळे थकबाकी अनुज्ञेय ठरणार नाही. तसेच जोडपत्र १ मध्ये नमूद संवर्गातील जे कर्मचारी दि. १ जानेवारी, २०१६ ते दि.३१ मे, २०२५ या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील, त्या कर्मचाऱ्यांची दि.१ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतनसंरचनेत काल्पनिक वेतननिश्चिती करण्यात यावी. दि.१ जानेवारी, २०१६ ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्तिवेतन सुधारित करण्यात यावे. सुधारित निवृत्तिवेतनाचे प्रत्यक्ष लाभ दि.१ जून, २०२५ पासून देण्यात यावेत, त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येऊ नये.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०६०२१६३८३८४१०५ असा आहे.




शासन आदेश डाऊनलोड करा...

         


महाराष्ट्र शिक्षण सेवा ब मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली २०२५|gr-shashan-nirnay-officer-transfer-education|

 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-ब मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली २०२५


उपशिक्षणाधिकारी व तत्सम
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग


महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ हे दिनांक ०१ जुलै, २००६ पासून अंमलात आले आहेत. सदर अधिनियमातील कलम ४ (४) (दोन) व कलम ४ (५) मधील तरतुदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या लगतनंतरच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या पूर्व मान्यतेने खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्याची विनंतीवरुन बदलीने त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या पदावर पदस्थापना करण्यात आलेली  आहे.




शिक्षक प्रोफाइल दुरुस्तीसाठी दिनांक 27 व 28 मे 2025 या दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे.

बदली अपडेट 2025



आज दिनांक 27 मे 2025 रोजी बदली पोर्टलवर शिक्षणाधिकारी लॉगिन मध्ये शिक्षकांची माहिती अपलोड करणे व असलेली माहिती दुरुस्त करणे यासाठी 28 मे 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.


त्याबरोबरच गटशिक्षणाधिकारी लॉगिन वरून शिक्षकांची प्रोफाइल माहिती एक्सेप्ट करण्यासाठी देखील दिनांक 28 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.


बदली पोर्टलवर दिनांक 24 मे 2025 रोजी बदली पात्र,  बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांच्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.


परंतु मुदतीत याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये अनेक चुका लक्षात आल्यामुळे आता त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांच्या प्रोफाईल मधील माहिती दुरुस्त करण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे.


अवघड क्षेत्रातील ज्या शाळा 2022 ला सुगम करण्यात आल्या अशा शिक्षकांना बदली अधिकार पात्र मधून एक संधी देण्याकरिता त्यांची पुरवणी यादी सुद्धा ज्या कार्यालयाची  अपलोड झालेली ती करण्याकरिता  गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वरून करण्याकरिता लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.


शिक्षक प्रोफाइल दुरुस्तीसाठी दिनांक 27 व 28 मे 2025 या दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे.


अर्थात दिनांक 28 मे 2025 पर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या व इतर याद्या पोर्टलवर पब्लिश होऊ शकतात.


बदली पोर्टल लिंक.    


https://ott.mahardd.com


 संचमान्यता सन 2023-24 व सन 2024-25 नुसार सर्व जिल्हा परिषदांनी रिक्त पदांची माहिती अद्ययावत करुन तयार ठेवावी. बदली प्रक्रिया करिता कोणती संच मान्यता घ्यावी याबद्दल अधिकृत सुचना दिलेली  नाही अधिकृत सूचना आरडीडी कडून प्राप्त झाल्यानंतर पोर्टल सुरु होताच सदर माहिती एक दिवसामध्ये भरुन पूर्ण करावी.*


मे.विन्सीस कडून बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येतील व बदलीची पुढील प्रक्रिया सुरु होईल.



जिल्हा अंतर्गत बदली- अवघड क्षेत्र निकष बाबत महत्त्वपूर्ण|teachers-online-transfer|

 जिल्हा अंतर्गत बदली- अवघड क्षेत्र निकष बाबत महत्त्वपूर्ण.....


थेट ग्रामविकास स्तरावरून,


जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 अंतर्गत अवघड क्षेत्रातील काही बदल या ठिकाणी प्रामुख्याने सर्व शिक्षक बांधवांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातून शिक्षकांनी याबाबत विचारणा केली होती. करिता याबाबत ग्राम विकास स्तरावरून मार्गदर्शन घेऊन सदर पोस्ट च्या माध्यमातून ही माहिती देण्यात येत आहे.

 *➡️अवघड क्षेत्रातील बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण..*


👉 अवघड क्षेत्रातून बदली प्राप्त शिक्षक हा त्या अवघड क्षेत्रात एकूण सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक झालेली असेल हा निकष महत्त्वपूर्ण मानला आहे. 




👉 अवघड क्षेत्रात एकाच शाळेवर सलग तीन वर्ष सेवा असणे गरजेचे नसून अवघड क्षेत्रातील एकूण सेवा ही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो संबंधित शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरतो. आणि अशा सर्व शिक्षकांची ( जे अवघड मधून अवघड मध्ये बदली केलेले असतील त्यांची सुद्धा) नावे ही बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये अंतर्भूत असणार आहे.


👉 ज्या शाळा 2022 पूर्वी अवघड क्षेत्रात होत्या आणि पुन्हा 2022 नंतर अवघड क्षेत्रात आलेल्या आहेत अशा शाळेवरील शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये दाखविले जाणार आहे. 


👉 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या यादीमध्ये संबंधित शिक्षकाची एकूण जिल्ह्यातील सेवा जेष्ठता हा निकष विचारात घेण्यात आलेला असून अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा हा निकष या यादीमध्ये विचारात घेण्यात आलेला नाही हे उल्लेखनीय .


👉 अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा विचारत न घेण्यात आल्याने एकूण सेवा ही त्या जिल्ह्यातील  शिक्षकांची ग्राह्य धरण्यात आल्याने अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा धारक शिक्षक हा बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये ज्युनियर ठरला आहे. 


*➡️संवर्ग १ व २ बाबत महत्वपूर्ण ..*


शासन निर्णय नुसार अवघड क्षेत्रामध्ये एकूण सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो संबंधित शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरतो.हा निकष संवर्ग एक अथवा दोन मधील शिक्षकांना देखील क्रमप्राप्त असल्याने संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांना  देखील विनंती बदली करिता अवघड क्षेत्रामध्ये एकूण सेवा ही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.


👉 अवघड क्षेत्रामधील बदली प्रक्रिया करिता बदली पात्र व रिक्त पदे दाखविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


करिता अवघड क्षेत्रातील सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव...



शिक्षणाधिकारी बदलीपात्र व अधिकारपात्र शिक्षक यादी प्रसिद्ध करणार|online-teacher-transfer-ottmahard-educational|

शिक्षणाधिकारी बदलीपात्र व अधिकारपात्र शिक्षक यादी  आज प्रसिद्ध करणार....

शिक्षक बदली पोर्टलवर वेळापत्रक अपडेट: शिक्षकांच्या प्रतिक्षेचा अंत

महाराष्ट्रातील शाळांमधील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. शिक्षक बदली प्रक्रियेच्या अधिकृत पोर्टलवर नवीन वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. राज्यातील हजारो शिक्षक गेल्या काही आठवड्यांपासून या वेळापत्रकाची वाट पाहत होते. शिक्षण विभागाने अखेर दिनांक 24 मे 2025 रोजी हे वेळापत्रक अपलोड केले असून, बदलीबाबत यादी संदर्भात  स्पष्ट करण्यात आले आहेत.     

शिक्षक बदली ही प्रक्रिया प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात होण्पापुर्वी पार पडते, जेणेकरून नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांना नव्या ठिकाणी रुजू होता येईल. यंदाही हेच उद्दिष्ट ठेवून शिक्षण विभागाने प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक  शिक्षकांचा समावेश होतो. 



महत्त्वाचे बदल आणि सूचना: 

या वर्षी ऑनलाईन प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक टप्प्यानंतर शिक्षकांना SMS व ईमेलद्वारे सूचना पाठवण्यात येणार आहे. याशिवाय, vinsys हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत जेणेकरून कोणतीही अडचण आल्यास शिक्षकांना त्वरित मदत मिळू शकेल.

शिक्षक संघटनांनी या वेळापत्रकाचे स्वागत केले असून, वेळेवर प्रक्रिया पार पडल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल, असे मत व्यक्त केले आहे. काही संघटनांनी मात्र ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली आहे.

शेवटी, शिक्षकांनी वेळापत्रकानुसार आपली कागदपत्रे, अर्ज व पर्याय वेळेत सादर करणे आवश्यक आहे. कोणतीही विलंब किंवा चुकीची माहिती प्रक्रिया थांबवू शकते. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने सजग राहून ही प्रक्रिया पूर्ण करावी.

राज्य सरकारने यंदा शिक्षक बदल्यांसाठी वेळापत्रक वेळेवर जाहीर करून प्रक्रियेतील पारदर्शकतेचा एक सकारात्मक पाऊल टाकला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

बदली संदर्भात मंत्रालय अपडेट पहा....


बदली अपडेट २०२५ - जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ग्रामविकास विभाग आज व्हिडिओ कॉन्फरन्स अपडेट

 बदली अपडेट २०२५ - जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ग्रामविकास विभाग आज व्हिडिओ कॉन्फरन्स अपडेट





 आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली बाबत महत्वपूर्ण..!

शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतर जिल्हा परिषद बाबत महत्त्वपूर्ण VC आज दिनांक 23 मे रोजी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीतील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे..

 आपसी आंतर जिल्हा बदली शिक्षकांच्या सेवा जेष्ठतेबाबत दिनांक बदल करण्यासाठी 17 मे ही अंतिम दिनांक देण्यात आलेली होती. त्यामुळे शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये बदल झाला असल्याने पुन्हा बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करावी करण्यात येतील.

 यानंतर समान करण्याच्या जागा निश्चित करून शिक्षक रिक्त पदांच्या जागा पोर्टल वर अपलोड होतील.


यानंतर संवर्ग एक व दोन ची यादी पोर्टलला अपलोड केल्या जाईल. प्रत्यक्ष समृद्ध एक करिता फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल. 


मात्र , यात....


महत्त्वपूर्ण मुद्दा


                     

दोन्ही बदली प्रक्रिया ही नवीन संच मान्यते नुसार म्हणजेच 2024-25 ने होणार असल्याने ज्या जिल्ह्यांची संच मान्यता पूर्ण झालेली असेल त्याच जिल्ह्यांमध्ये बदली प्रक्रिया राबवण्यात येईल. 


 याबाबत संबंधित जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या जिल्हा परिषदेची संच मान्यता पूर्ण झाल्याचे ग्रामविकास विभागाला लेखी कळविणे बंधनकारक असल्याचे VC मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले.


  दोन्ही बदली प्रक्रिया ही नवीन संच मान्यते नुसार म्हणजेच 2024-25 ने होणार असल्याने ज्या जिल्ह्यांची संच मान्यता पूर्ण झालेली असेल त्याच जिल्ह्यांमध्ये बदली प्रक्रिया राबवण्यात येईल. 


 याबाबत संबंधित जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या जिल्हा परिषदेची संच मान्यता पूर्ण झाल्याचे ग्रामविकास विभागाला लेखी कळविणे बंधनकारक असल्याचे VC मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले.

ज्या जिल्हा परिषदे कडून संच मान्यता पूर्ण झाल्याचे कळविण्यात येईल, त्याच जिल्हा परिषदेमध्ये बदली प्रक्रिया होणार आहे.


 मात्र नवीन संचमान्यतेनुसार ज्या जिल्ह्यात शिक्षकांची पद अतिरिक्त असतील त्यांचे समायोजन न्यायालयीन प्रक्रियेमुळे आताच होणार नाही.

 या जिल्हा परिषदांची संचमान्यता पूर्ण असेल अशा जिल्हा परिषदांचा समावेश बदली पोर्टलवर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. 



या संदर्भात लवकरच ग्राम विकास विभाग स्तरावरून स्पष्ट आदेश सर्व जिल्हा परिषदांना निर्गमित होणार आहेत.


सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव...

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर प्रोफाइल 4 दिवसात अपडेट करावी लागणार|teacher-transfer-ottmahard-online|

सेवाज्येष्ठता अनुज्ञेय करुन त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशीत केले आहे.

  मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र.५२०६/२०२५, ५२०७/२०२५ व ५२०८/२०२५ बाबत

                       

संदर्भ :- १. मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांचे दि.०९.०५.२०२५ रोजीचे आदेश.


२. शासन पत्र क्र. बैठक-१४२५/प्र.क्र.७२/आस्था-१४, दि.२८.०३.२०२५




उपरोक्त विषयाबाबत मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल याचिका क्र. ५२०६/२०२५ व अन्य संलग्न याचिकांमध्ये मा. उच्च न्यायालयाने दि.०९.०५.२०२५ रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे. तसेच संदर्भ क्र. २ येथील शासन समक्रमांक दि.२८.३.२०२५ रोजीच्या पत्रान्वये निर्गमित इतिवृत्तातील अनुक्रमांक ३ येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत.


२. उपरोक्त न्यायनिर्णयाद्वारे मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील नियम ६ (८) (२) नुसार सेवाज्येष्ठता अनुज्ञेय करुन त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करुन त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसांमध्ये पूर्ण करण्याची सर्व मुख्यधिकारी जि. प. यांना विनंती करण्यात आलेली आहे.


प्रत माहितीस्तवः-           


१) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.


२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).


मूळ आदेश पहा...




बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक|ottmaha-teacher-transfer-timetable|

शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक 




 बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक 



शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2024- 25 या वर्षातील वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल..

Ottmaha



*बदली संवर्ग -१ :-* 

28 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 

कालावधी एकूण सात दिवस


*बदली संवर्ग २ :-*

4 मे 2025 ते 9 मे 2019 

एकूण कालावधी सहा दिवस 


*बदली संवर्ग ३:-*

10 मे 2025 ते 15 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


*बदली संवर्ग 4 :-*

16 मे 2025 ते 21 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


*विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया राऊंड :-*

22 मे 2025 ते 27 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


*अवघड क्षेत्रातील जागा भरणे:-*

28 मे 2025 ते 31 मे 2015 

एकूण कालावधी चार दिवस 


उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्राम विकास विभाग स्तरावर देण्यात आलेली आहे. अनेक शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या वेळापत्रक  करिता सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात येत आहे.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत...|शासन-निर्णय-gr-zpschool-educational-news|

 शासन निर्णयाव्दारे स्थापन केलेल्या समीत्यांचे विलीनीकरण खालील प्रमाणे करण्यात येत आहे.





शाळा व्यवस्थापन समिती

समाविष्ट/विलीन करावयाच्या समिती




१. माता पालक संघ

२. शालेय पोषण आहार योजना समिती

३. पालक शिक्षक संघ

४. नवभारत साक्षरता समिती

५. तंबाखू सनियंत्रण समिती

६. SQAAF स्वयं मूल्यांकन समिती

विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती

१. विद्यार्थी सुरक्षा समिती

२. तक्रार पेटी समिती

३. शाळा बांधकाम समिती

४. परिवहन समिती

५. शाळा व्यवस्थापन व विकास समिती

६. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती



यापुढे शाळास्तरावर आवश्यक समित्या पुढीलप्रमाणे-


1) शाळा व्यवस्थापन समिती


2) सखी सावित्री समिती


3) महिला तक्रार निवारण समिती / अंतर्गत तक्रार समिती


4)  विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती


शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये 


१. शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे.


२. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे.


३. त्या शाळेस शासनाकडून / स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणा-या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे.


४. बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे व यासंदर्भातील पालक, शाळा, स्थानिक प्राधिकरण राज्य शासन यांच्या जबाबदा-यांबाबत माहिती देणे.


५. शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे


६. बालकांची १०० टक्के उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे.


७. शाळेतील विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नयेत या करीता संबंधित पालकांशी चर्चा करून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता प्रयत्न करणे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना पुन्हा नियमित शाळेत येण्याकरीता प्रयत्न करणे.


८. दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.


९. शाळेतील विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे. त्यांच्या अध्ययन सुविधांचे सनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे


१०. शाळेतील प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे सनियंत्रण करणे


११. शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्चलेखे तयार करणे


१२. शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.


१३. मुख्याध्यापकांच्या दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे.


१४. निरूपयोगी साहित्य रू ५०००/- (रू. पाच हजार मात्र) किंमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे.


१५. शाळा इमारत इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरूस्त्यांवर देखरेख करणे.


१६. शिक्षकांची अनियमितता, गैरवर्तन, वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखी स्वरूपात सूचना देणे व त्यांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठविणे.


१७. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करणे.


१८. वर्षातून दोन वेळा माता पालक व पिता पालक यांचा मेळावा आयोजित करणे.


१९. नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेचे शाळा स्तरावरील अंमलबजावणी कार्यावर सनियंत्रण करणे.


२०. शालेय परिसर हा तंबाखू मुक्त होण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणीवर देखरेख आणि सनियंत्रण करणे. 


२. सखी सावित्री समिती


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२२/प्र.क्र.३९/एसडी-४ दिनांक १०.०३.२०२२ अन्वये सखी सावित्री समितीची रचना व कार्ये राहतील.


३. महिला तक्रार निवारण समिती/अंतर्गत तक्रार समिती-

   

महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मकचौ २००६/ प्र.क्र.१५/मकक, दिनांक १९.०९.२००६ व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मकचौ २०१३/प्र.क्र.६३/मकक, दिनांक १९.०६.२०१४ व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मकचौ २०१४/प्र.क्र.६३/मकक, दिनांक ११.०९.२०१४ अन्वये सदर समितीची रचना व कार्ये राहतील.


४. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती -


इयत्ता १ ते १२ चे वर्ग / यापैकी वर्ग असलेल्या शाळांसाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. सदर समिती १२ ते १६ सदस्यांची राहील.

शासन निर्णय पहा...






शिक्षकांची अशैक्षणिक कामं कमी

 अशैक्षणिक काम कमी करण्याचा निर्णय : "राज्यातील शिक्षकांची किमान ५० टक्के अशैक्षणिक कामं कमी करण्याचा निर्णय येत्या १५ दिवसातच घेण्यात येईल.

 जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्याचे आव्हान आहे. यासाठी शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. बहुसंख्य जिल्हा परिषद शिक्षक नवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढवीत आहेत, ते राज्यभरातील शाळांमध्ये अंमलबजावणी करु व राज्यात अशा शिक्षकांची 'आयडॉल बँक' तयार करण्याचा मानस समोर ठेवला आहे. सुट्ट्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून नवीन उपक्रमांबाबत पालकांना माहिती द्यावी, जेणेकरून पटसंख्या वाढीत मदत होईल व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व पटसंख्या टिकून राहील, यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे," असं आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलं.


; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; font-weight: bolder;">गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे : शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण निर्णय आगामी काळामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे मे महिन्यातच वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच ज्या शाळांना इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत अशा ठिकाणी इमारती, वर्गखोल्या उभारणीसाठी शासन प्रयत्नशील असून, यासाठी विविध सेवाभावी संस्थांचीदेखील मदत घेण्यात येणार असल्याचं दादा भुसे म्हणाले. वास्तवात सध्या जिल्हा परिषद, नगरपालिका त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे पटसंख्या टिकविण्याचे आव्हान समोर आहे. अशा परिस्थितीत सर्व शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिलेत.

22222

संवर्ग एक व दोन मधून प्रथमत: बदली करताना सेवेची अट नसल्याबाबतचे आजचे परिपत्रक|teacher-transfer-ottmaha-शिक्षक-बदली|

संवर्ग एक व दोन मधून प्रथमत: बदली करताना सेवेची अट नसल्याबाबतचे परिपत्रक....


या विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरीता या विभागाचे दि.२३.११.२०२२ रोजीचे पत्र रद्द करुन, शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्र.३ येथील दि.२.४.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये आपणांस कळविण्यात आले आहे.

               

२. उपरोक्त दि.२.४.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी प्रथमतः विनंती अर्ज सादर करण्याकरीता विद्यमान शाळेतील ३ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही.


उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याकरीता तात्काळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.


मूळ आदेश पहा...

शिक्षक बदली




How to make Ghibli art |create-ghibliart-chatgpt|

 घिबली (Ghibli) हा जपानी ऍनिमेशन स्टुडिओ आहे, 


ज्याची स्थापना 1985 साली प्रसिद्ध ऍनिमेटर हायाओ मियाझाकी यांनी केली. स्टुडिओ घिबलीने "स्पिरिटेड अवे," "माय नेबर तोतोरो," "प्रिंसेस मोनोनोके" आणि "हाऊल्स मूव्हिंग कॅसल" यांसारखे अनेक उत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट तयार केले आहेत, ज्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.



सध्याच्या काळात, घिबली स्टुडिओच्या विशिष्ट अॅनिमेशन शैलीची लोकप्रियता वाढली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून घिबलीसारखी चित्रे तयार करणे हा एक नवीन ट्रेंड बनला आहे. उदाहरणार्थ, OpenAI च्या chatGP आणि इलॉन मस्क यांच्या Grok सारख्या AI साधनांचा वापर करून, वापरकर्ते घिबली शैलीतील चित्रे आणि मीम्स तयार करत आहेत. 

हे साधने वापरून, आपण आपल्या फोटोंना घिबलीच्या सौंदर्यशास्त्रानुसार रूपांतरित करू शकता. 


घिबली शैलीतील प्रतिमा तयार करण्यासाठी, AI साधनांमध्ये आपल्या फोटोंना अपलोड करून किंवा विशिष्ट सूचनांद्वारे आपण ही कला साध्य करू शकता. हे साधने वापरून, आपण आपल्या फोटोंना घिबलीच्या सौंदर्यशास्त्रानुसार रूपांतरित करू शकता.


घिबली स्टुडिओची कला आणि शैली जगभरातील ऍनिमेशन प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या अॅनिमेशनमधील सौंदर्य, तपशीलवार पार्श्वभूमी, आणि हळुवार कथा सांगण्याची पद्धत ही घिबलीची खासियत आहे.

How to make ghibli art 

घिबली फोटो कसे तयार करायचे...

 
घिबली शैलीतील फोटो तयार करण्यासाठी विविध AI साधने उपलब्ध आहेत. खालील पर्यायांचा विचार करू शकता:

1. ChatGPT आणि DALL·E:

ChatGPT Plus, Pro, किंवा Team सदस्यत्व असल्यास, DALL·E च्या मदतीने घिबली शैलीतील प्रतिमा तयार करू शकता.

प्रक्रिया:

ChatGPT उघडा.

फोटो अपलोड करा ज्याला घिबली शैलीत रूपांतरित करायचे आहे.

प्रॉम्प्ट द्या: "हा फोटो स्टुडिओ घिबली-शैलीतील अॅनिमेशनमध्ये रूपांतरित करा."

तयार झालेली प्रतिमा डाउनलोड करा. 




2. OpenArt.ai:

हे साधन AI च्या मदतीने विविध कला शैलींमध्ये, विशेषतः स्टुडिओ घिबलीच्या शैलीत, चित्रे तयार करण्यास उपयुक्त आहे.

शाळा १५ जूनलाच सुरू |zpschool-educational-news-schooladmission-rte-admission|

 

शाळा १५ जूनलाच सुरू होणार ! 

५ ते २५ एप्रिलपर्यंत परीक्षा अन्‌ उन्हाळा सुट्ट्यांमुळे १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष अशक्य; ‘CBSE’च्या शाळा मात्र १ एप्रिलपासून       


१ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप निर्णय झालेला नसून तसा आदेशही प्राप्त नाही. अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर शाळांना १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्या असतील आणि त्यानंतर १५ जूनपासूनच शाळा सुरू होतील.





राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्य मंडळाच्या सर्वच शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा ८ ते २५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. त्यांचा निकाल १ मे रोजी जाहीर होईल आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश २ मेपासून सुरू होतील. चालू शैक्षणिक वर्षातील नियोजित उन्हाळा सुट्या देखील द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे २०२५-२६ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच सुरू होईल, 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य मंडळाचे शैक्षणिक वर्ष देखील १ एप्रिलपासून सुरू होणार आहे, पण त्यासाठी आणखी एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. तत्पूर्वी, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पहिली व दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे. शाळा १ एप्रिलपासून सुरू करण्यासाठी अगोदर विद्यार्थ्यांच्या उन्हाळा, दिवाळी सुट्या निश्चित कराव्या लागतील.

शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस अध्यापन होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सार्वजनिक सुट्या आणि परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासंबंधीची कार्यवाही अजून पूर्ण झालेली नाही. त्यातच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परीक्षेच्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून शक्य नसून पालक व विद्यार्थ्यांनी मनातील संभ्रम काढून टाकावा, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच

१ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप निर्णय झालेला नसून तसा आदेशही प्राप्त नाही. अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर शाळांना १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्या असतील आणि त्यानंतर १५ जूनपासूनच शाळा सुरू होतील. गुढीपाडव्यानंतर शिक्षक प्रवेशासाठी पालकांच्या गाठीभेटी सुरू करतात. १ मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर पहिलीच्या वर्गाचे प्रवेश सुरू होतात.

     Nps /Gps पेन्शन स्कीम संदर्भात पहा...          

‘सीबीएसई’च्या शाळा १ एप्रिलपासून भरणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. पण, राज्य मंडळाच्या शाळा १ एप्रिलपासून सुरू करण्यासंदर्भातील राज्य शासनाचा निर्णय अजून झालेला नाही. 

UPS / GPS विकल्प बाबत |old-pension-nps-gpf-goverment-employee-jobs|

 UPS / GPS विकल्प बाबत...


आज रोजी महाराष्ट्रातील साडेआठ लाख NPS धारक सरकारी कर्मचाऱ्यांच्या समोर सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे की कोणत्या योजनेचा विकल्प द्यावा..?


*मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी देखील अद्याप राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (GPS / RNPS) ची कार्यपद्धती , त्यातील छुप्या अटी शर्ती बाबत कोणताही शासन निर्णय अथवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.. असे असतांना कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2025 अखेर विकल्प मागणे म्हणजे कर्मचाऱ्यांना एकप्रकारे अंधारात लोटण्यासारखा प्रकार सुरू आहे..

gps nps


याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पुढील एक दोन दिवसात मंत्रालयात वित्त विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन याबाबत लेखी तीव्र आक्षेप नोंदवण्यात येईलच.. तूर्तास या विकल्पा च्या निवडी कडे येऊ..

UPS / GPS / NPS यापैकी एकाची निवड करताना सर्वप्रथम त्यातील तरतुदी , अटी शर्ती समजून घेणे गरजेचे आहे..

या सगळ्यांचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपली परिस्थिती *"To Be or not to Be*, सोबत

*To Live or Not to Live..."* अशी होणार आहे..

कारण UPS व GPS योजनात सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्याची सर्व अंशदान रक्कम जप्त करून त्याबदल्यात त्यास मृत्यु पर्यंत तथाकथित 50% पेन्शन मिळणार आहे.. ( तथाकथित 50% या शब्दाचा खुलासा पुढे येईलच..) त्यामुळे निवृत्तीनंतर जास्त काळ जीवंत राहणे आवश्यक असणार आहे, तरच आपण आपल्या जप्त झालेल्या रकमेपेक्षा जास्त पेन्शन यात कमवू शकू..

तर दुसरीकडे निवृत्ती च्या उंबरठ्यावर असलेल्या NPS कर्मचाऱ्यांना सेवेत मृत्यू आल्यास कुटुंबास जुनी पेन्शन मिळते, आणि NPS मध्ये कपात रक्कम परत ही मिळते, मात्र सेवानिवृत्त झाल्यावर NPS मधील जमा रकमेच्या आधारे एन्यूटी वर आधारित पेन्शन/ फॅमिली पेन्शन मिळते..

यापूर्वी UPS / GPS / NPS व OPS ची तुलना करतांना आधीच अनेक चुकीच्या अटी शर्ती मुद्दे आपल्यासमोर स्पष्ट केले आहेत, ज्यात प्रमुख बाब म्हणजे कर्मचाऱ्यांची आयुष्यभराची कपात जप्त करून त्याबदल्यात पेन्शन देणाऱ्या योजना आहेत..

*आता त्या तुलनेत आणि चुकीच्या मुद्दात नव्याने भर पडली ती बेंचमार्क कॉर्पस च्या अटीने..*

_UPS योजनेत केंद्र सरकारने हळूच बेंचमार्क कॉर्पस ची अट टाकली आणि आधीचे सारे गणित व तुलना अचानक बदलूनच गेले.._ कारण  

*_'ज्याची कपात सेवा 25 वर्ष आहे, अश्या कर्मचाऱ्यास हमखास 50% पेन्शन मिळेल_'*  असा जो सर्वांचा गैरसमज होता , तो या *'बेंचमार्क कॉर्पस'* ने पुसून टाकला आहे..


*'बेंचमार्क कॉर्पस'* म्हणजे तुमच्या खात्यात सुरुवात पासून शेवट पर्यंत ( नोकरी सुरू ते सेवानिवृत्त होई पर्यंत) ची रेग्युलर कपात, त्यावर शासनाकडून वेळेवर जमा केलेले जाणारे अंशदान, NPS खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.. अशी रक्कम म्हणजे बेंचमार्क कॉर्पस.. लेट कपात, कपात खंड, DCPS असतांना उशिरा व्याज जमा करणे, DCPS रक्कम NPS मध्ये उशिरा वर्ग करणे इत्यादी मुळे नुकसान होणारी व बेंचमार्क होण्यासाठी कमी पडणारी रक्कम पेन्शन च्या टक्केवारी वर परिणाम करणार आहे..

उदा- समजा, तुम्ही आणि तुमचा मित्र/ मैत्रीण नोकरीत एकाच दिवशी एकाच पदावर लागलात, आणि एकाच दिवशी एकाच पगारावर निवृत्त झालात.. तुमची दोघांची एकूण वास्तव सेवा 35 वर्ष होती.. मात्र दोघांच्या अंशदान कपात सेवेत तफावत आहे..

   

समजा तुमच्या मित्राची अंशदान कपात ही 35 वर्ष झाली आणि तुमची कपात ही अनियमित होती, त्यात सुरुवातिचे किंवा मधले 10 वर्ष कपात बंद होती, आणि एकूण 25 वर्ष कपात झाली..

इथे तुमच्या मित्राची रक्कम म्हणजे बेंचमार्क एवढी असणार कारण ती नियमित आहे, डीफॉल्ट ऑप्शन ची आहे..

समजा तुमच्या मित्राची निवृत्तीवेळी एकूण जमा रक्कम = 50 लाख रु आहे, तर तुमचे एकूण जमा 25 लाख रु आहेत.

त्याचे व समजा तुमचे शेवटचे मूळ वेतन 1 लाख रु होते, हे दोघांचे सारखे होते,

आता त्याला (तुमच्या मित्राला) मिळणारी पेन्शन = [ 1लाख / 2 ] × ( 300/300 )× ( 50 लाख रु / 50 लाख रु) + DA

= 50,000 ×1×1 + DA

= 50,000 रु.. + DA

आता तुम्हाला मिळणारी पेन्शन किती असेल ते बघू..

तुमची पेन्शन = ( 1लाख / 2 ) × (300/300) × ( 25 लाख / 50 लाख ) + DA

= 50,000 × 1 × 0.5 + DA

= 25, 000 रु + DA

म्हणजेच एकूण 25 वर्ष कपात असतांना ही शेवटच्या वेतनाच्या 50% ऐवजी 25% पेन्शन मिळाली, कारण कर्मचारी अपेक्षित कॉर्पस जमा करू शकला नाही, कारण 35 वर्ष सेवेत त्याची कपात अनियमित, खंडित होती.. जर त्याची संपूर्ण 35 वर्ष ( अर्थात वास्तव सेवा वर्षा एवढी व नियमितपणे ) कपात झाली असती तर त्याची रक्कम बेंचमार्क लेव्हल एवढी असती..

म्हणजे तुम्ही सरकारला 25 वर्षाची कपात सरेंडर करून देखील 50% पेन्शन मिळत नाहीय..

*GPS मध्ये बेंचमार्क कॉर्पस अट असेल का? आणि जर समजा GPS मध्ये बेंचमार्क कॉर्पस ची अट आली तर GPS मध्ये सरकारने दिलेल्या 20 वर्ष सेवेवर 50% पेन्शन च्या ग्यारंटी चे काय.?*


आज रोजी GPS मध्ये बेंचमार्क कॉर्पस अट चा उल्लेख नाहीय, तथापि जशी ऐनवेळी UPS मध्ये बेंचमार्क कॉर्पस ची अट टाकल्या गेली तशी ती अट महाराष्ट्र शासनाच्या GPS योजनेत ही येऊ शकते, जोपर्यंत GPS च्या सविस्तर अटी शर्ती ज्या अद्याप ( 15 मार्च 2025) पर्यंत तरी जाहीर नाहीत, त्या आल्याशिवाय GPS च्या 50% पेन्शन ग्यारंटी बाबत कोणतीही खात्री देता येणार नाही...

आणि समजा राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेत अर्थात आपल्या भाषेत GPS मध्ये बेंचमार्क कॉर्पस ची अट आली तर मग GPS योजना ही UPS पेक्षाही वाईट असणार , कारण GPS योजनेत एकतर कर्मचाऱ्यांची सर्वची सर्व 100% NPS कपात ( जमा रक्कम ) जप्त केली जाणार आहे व ते देऊन ही 50 % पेन्शन मिळेल की नाही याची खात्री नाही, जेव्हा की UPS मध्ये शेवटच्या पगाराच्या 10% रकमेला एकूण सहामाही सेवा (कपात सेवेचा सहामाही काळ) गुणून तितकी रक्कम निवृत्तीवेळी मिळणार आहे, जी अंदाजे एकूण जमा अंशदानाच्या 8 ते 10% च्या इतकी असणार आहे.. अर्थात उर्वरीत 90 ते 92% ही जप्त होणारच आहे..   

म्हणजेच UPS व GPS मध्ये पेन्शन ची टक्केवारी जवळपास सारखी राहील मात्र GPS मध्ये ती थोडी बहुत रक्कम ही परत मिळणार नाही..

जर GPS मध्ये बेंचमार्क कॉर्पस अट नसेल तर..

जर GPS मध्ये बेंचमार्क कॉर्पस अट नसेल तर सुरुवातीला कपात बंद असणाऱ्या / अनियमित कपात असून देखील भविष्यात 20 वर्ष कपात सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50% पेन्शन मिळेल.. अर्थात जे नियमित कपात वाले आहेत त्यांना त्यांची कपात सुरूच ठेवावी लागेल..


*माझी कपात रेग्युलर आहे, मी कोणती योजना स्वीकारू..? NPS राहू देऊ की GPS / UPS?*


आता या प्रश्नाचं उत्तर असं आहे की _तुम्ही किती आयुष्य जगणार आहात.? तसेच तुमचा जोडीदार तुमच्या नंतर किती वर्षे जगणार आहे.?_


सदर प्रश्न आपणास मूर्खपणाचे वाटत असतील, आणि ते आहेही तशेच, पण त्यावरून ठरणार आहे की तुम्ही तुमची कपात रक्कम जप्त होऊ देऊन किती काळ जिवंत राहून गमावलेल्या तुमच्या जप्त केलेल्या NPS रकमे पेक्षा जास्त रक्कम UPS/GPS पेन्शन रूपाने कमावता की नाही ते..?


एका निष्कर्ष नुसार जे कर्मचारी 65 वर्ष आयुष्यमान जगातील त्यांच्या नंतर व त्यांची / त्यांचा जोडीदार पुढे 5 वर्षे जगल्यास त्यांना मिळालेल्या पेन्शन / फॅमिली पेन्शन ची टोटल केल्यास ती जप्त केलेल्या ( निवृत्तीवेळी जप्त केलेल्या) रकमेची बरोबरी करू शकेल..

(इथे जरी बरोबरी झाली असली तरी त्या रकमेचे मागील 13 वर्षाचे व्याज मोजले तर आणखी आपल्याला 4 / 5 वर्ष जगून पेन्शन मिळवावी लागेल, तेव्हा खरी बरोबरी होईल) असो..

ज्यांनी NPS खात्यातून 25% रक्कम काढलेली असेल त्यांचं काय.?

अर्थातच ज्यांनी NPS खात्यातून 25 % रक्कम काढलेली असेल त्यांच्या त्या रकमेमुळे त्यांच्या कॉर्पस वर परिणाम होणार आहे, त्यामुळे जितकी रक्कम बेंचमार्क लेव्हल पर्यंत जाण्यास कमी पडेल त्या प्रमाणात पेन्शन टक्केवारी कमी मिळेल..


उदा- एखाद्याने 1 लाख रु काढले, आणि ते काढल्या पासून 20 वर्षानंतर तो रिटायर्ड झाला, अश्यावेळी त्या 1 लाख रु व त्यावरचे 20 वर्षांचे व्याज अशी ही एकूण रक्कम बेंचमार्क साठी कमी पडणार आहे.. व तेवढा परिणाम त्यांच्या पेन्शन वर होईल..


*समजा एखाद्या कर्मचाऱ्याने NPS योजनेत डिफॉल्ट ऐवजी ACTIVE पॅटर्न निवडला आहे, तर त्याला 50% पेन्शन मिळेल काय.? आणि त्याने जर डिफॉल्ट च्या तुलनेत जास्त कॉर्पस जमा केला तर काय.? किंवा डिफॉल्ट च्या तुलनेत लॉस झाला व कमी रक्कम जमा झाली तर काय.?*

ज्याने NPS मध्ये डिफॉल्ट (सरकार कडून होणारी गुंतवणूक) गुंतवणूक पॅटर्न ऐवजी स्वतः गुंतवणूक करण्याचा Active पॅटर्न निवडला आहे, आणि जर त्याने डिफॉल्ट पॅटर्न पेक्षा जास्त कॉर्पस जमा केला / करवला, ( अर्थात जर तो बेंचमार्क कॉर्पस पेक्षा जास्त असेल ) तर वरची जास्तीची रक्कम त्याला परत मिळेल.. व सोबत 50% पेन्शन ही मिळेल..

मात्र जर त्याच्या खात्यात डिफॉल्ट च्या तुलनेत कमी रक्कम जमा झाली अर्थात ती रक्कम बेंचमार्क कॉर्पस पेक्षा कमी असेल त्यावेळी त्याच्या 50% च्या पेन्शन टक्केवारी घट होईल..

● *एकंदरीत GPS/UPS योजनेत मिळणारी पेन्शन ही खालील घटकांवर अवलंबून आहे..*

१.कपात सेवा

२.जमा कॉर्पस / बेंचमार्क कॉर्पस

३.फंड निवड (डिफॉल्ट)

४.NPS मधून अंशतः काढलेली / न काढलेली रक्कम

५.आपण किती आयुष्यमान जगू

६.आपल्यानंतर आपला जोडीदार (पत्नी/पती) किती वर्षे जगेल..?


*_सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत..?_*


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना NPS सोबत UPS व GPS चा पर्याय उपलब्ध आहे..


*_UPS:- UPS मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना UPS मध्ये जी पेन्शन fix होईल ती मागील सेवानिवृत्ती तारखे पासून मिळेल.. अर्थात त्या बदल्यात त्यांची मिळालेली 60% रक्कम व 40% रक्कम व त्यावरील मिळालेली एन्यूटी समायोजित केली जाईल.. व जो काही फरक (Arrear ) असेल ती रक्कम अदा केली जाईल.._*

                                UPS / GPS विकल्प बाबत...

*_GPS :- GPS मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2024 पर्यंत NPS नुसार पेन्शन देय आहे आणि 1 एप्रिल 2024 पासून GPS नुसार पेन्शन देय आहे, अर्थात ते पण NPS रक्कम जप्त करून / समायोजित करून.._*


*_सर्वच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना UPS व GPS मध्ये पेन्शन मिळेल का.?_*


ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कपात सेवा किमान 10 वर्ष आहे केवळ त्यांनाच यात पेन्शन मिळेल..


*_GPS मध्ये 20 वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळेल..?_*


GPS मध्ये 1 वर्षासाठी 2.5 % पेन्शन असा ढोबळ सर्वसाधारण पेन्शन फॉर्म्युला आहे,

त्यामुळे 10 वर्ष सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्याला शेवटच्या वेतनाच्या 25% पेन्शन मिळेल..

तर 11 वर्ष = 27.5% पेन्शन

12 वर्ष = 30 %

13 वर्ष = 32.5%

14 वर्ष = 35%

15 वर्ष = 37.5%

16 वर्ष = 40%

17 वर्ष = 42.5%

18 वर्ष = 45%

19 वर्ष = 47.5%

20 वर्ष = 50%

मात्र जर 20 वर्षापेक्षा जास्त कपात सेवा असेल तरीही पेन्शन टक्केवारी ही 50% राहील..

तर UPS मध्ये 1 वर्षाच्या कपात सेवेसाठी 2% पेन्शन असा हिशोब आहे, त्यानुसार

10 वर्ष सेवा = 20 % पेन्शन

11 वर्ष = 22% पेन्शन..

याप्रमाणे 25 वर्ष 50% ..

(अर्थात हे तेव्हाच मिळेल ज्यावेळी वर सुरुवातीला उल्लेखित प्रमाणे कपात नियमित , डिफॉल्ट नुसार असेल व ती जप्त होईल..)

UPS / GPS मध्ये मिळणारी किमान पेन्शन रक्कम..

UPS मध्ये किमान पेन्शन 10,000 रु व GPS मध्ये किमान पेन्शन 7500 रु आहे..

(इथे लक्षात घ्यावे की ही रक्कम एकत्रीत पेन्शन रक्कम आहे, ना की पेन्शन बेसिक)

समजा एखादा सेवानिवृत्त कर्मचारी ज्याची कपात सेवा 12 वर्ष आहे, त्याला UPS मध्ये 24% पेन्शन मिळेल.. जर त्याची एकूण मासिक पेन्शन 10,000 रु पेक्षा कमी असेल तर त्याला राउंड फिगर 10,000 रु दिल्या जातील..

DA वाढ नुसार जेव्हा त्या कर्मचाऱ्याची पेन्शन ही किमान पेन्शन रकमेच्या अर्थात 10,000 रु च्या वर जाईल, तेव्हा त्याला किमान पेन्शन ऐवजी जास्तीची पेन्शन रक्कम मिळेल.. व ती मिळत राहील..

GPS मध्ये ही कर्मचाऱ्याला पेन्शन टक्केवारी नुसार पेन्शन रक्कम मिळेल मात्र जर ती रक्कम 7500 रु या पेक्षा कमी असेल तेव्हा त्याला 7500 रु मिळतील , व तोपर्यंत मिळतील जोपर्यंत DA वाढ नुसार पेन्शन रक्कम 7500 रु चा आकडा क्रॉस करत नाही तोपर्यंत..

वरील सेवानिवृत्त कर्मचारी जर GPS मध्ये असेल आणि त्याला 12 वर्ष सेवेवर 30% नुसार समजा जर 8500 रु पेन्शन गणना होत असेल तर त्याला 8500 रु च पेन्शन मिळेल..

खर तर जुन्या पेन्शन योजनेत अश्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांची किमान सेवा 10 वर्ष होती त्यांना 50% पेन्शन पात्रतेची हमी होती , आणि किमान पेन्शन ची संकल्पना ही त्या सेवाज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी होती जे जास्त वर्ष जगातील आणि कदाचित 50% पेन्शन नुसार देखील एकत्रित 9000 रु प्राप्त करू शकणार नाहीत अशा साठी किमान पेन्शन चे निर्धारण होते..

पण इथे त्या किमान पेन्शन चा स्वतःच्या सोयीप्रमाणे वापर सरकारांनी केला आहे..


*आता काही प्रश्नांच्या स्वरूपात समजून घेऊ.. FAQ*


*_प्र.१) विकल्प देणे बंधनकारक आहे का.?_*


नाही.. विकल्प देणे बंधनकारक नाही, ज्यांनी विकल्प दिला नाही, त्यांना NPS योजना लागू राहणार आहे..


*_प्र.२) GPS विकल्प दिला नाही तर भविष्यात UPS घेता येईल का.?_*


होय.. कारण UPS योजनेची अद्याप केंद्रात देखील अंमलबजावणी सुरू झालेली नाहीय, त्यामुळे ज्यांना UPS योजना घ्यायची असेल त्यांनी 31 मार्च पर्यंत विकल्प देणे बंधनकारक नाही..


*_प्र.३) UPS चा विकल्प कधीपर्यंत देता येईल?_*


UPS योजनेचा विकल्प हा केंद्र सरकार जेव्हा विकल्प भरणे सुरू करेल त्या नुसार अंतिम तारखेपर्यंत देता येईल..

(कदाचित पुढील 6 महिने ते 1 वर्षा पर्यंत)


*_प्र.४) एकदा GPS विकल्प दिल्यावर UPS चा विकल्प घेता येईल का?_*


होय.. जर आज एखाद्या कर्मचाऱ्याने GPS चा विकल्प दिला तरी त्याला भविष्यात केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या तारखे पर्यंत UPS चा विकल्प देता येईल..


*_प्र.५) आज UPS चा विकल्प दिल्यावर व 31 मार्च ची अंतिम मुदत संपल्यावर GPS घेता येईल येईल का?_*


नाही.. सध्यातरी UPS वरून GPS घेता येणार नाही..


*_प्र.६) UPS / GPS विकल्प दिल्यानंतर भविष्यात NPS घेता येईल का?_*


नाही, सध्यातरी तसा नियम नाही, एकदा का GPS / UPS स्वीकारली तर पुन्हा NPS घेता येणार नाही..


*_प्र.७) NPS मध्ये राहिलो तर आणि रिटायरमेंट पूर्वी मरण पावलो तर.?_*


- अश्यावेळी 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार कुटुंबाला जुनी पेन्शन (शेवटच्या वेतनाच्या 50% पुढील 10 वर्ष व त्यानंतर 30%) अंतर्गत पेन्शन मिळेल व सोबत मृत्यू उपदान आणि NPS मधील कर्मचारी हिस्सा (व्याज परताव्या सह) परत मिळेल.


*_प्र.८) UPS / GPS मध्ये गेलो तर सेवेत असतांना मृत्यू झाल्यास कोणती पैन्बान योजना मिळेल.?_*


- UPS किंवा GPS या दोन्ही योजना NPS अंतर्गत च योजना आहेत, त्यामुळे UPS किंवा GPS स्विकरणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत असतांना मृत्यू झाल्यास वरील प्रमाणे जुनी पेन्शन चे च लाभ लागू राहतील अशी आमची धारणा आहे, मात्र तसा उल्लेख UPS च्या राजपत्रात आढळून येत नाही, तथापि तो लाभ यात असणार आहे तो नाकारता येणार नाही..


*_प्र. ९) NPS धारकांना जसे आजरोजी सेवानिवृत्ती नंतर रिटायरमेंट ग्रॅच्युटी लागू आहे, तशी रिटायरमेंट ग्रॅच्युटी UPS / GPS मध्ये मिळेल का.?_*


- सध्यातरी तसा उल्लेख UPS च्या राजपत्रात नाहीय, पण ज्यावेळी UPS जाहीर केली त्यावेळी कर्मचाऱ्यांना UPS मध्ये मिळणारी लमसम रक्कम ही ग्रेच्युटी व्यतिरिक्त असेल असा उल्लेख करण्यात आला होता, त्यामुळे UPS मध्ये ग्रॅच्युटी असण्याची शक्यता आहे, पण अद्याप त्याविषयी ठामपणे सांगता येणार नाही...


*_प्र.१०) NPS मध्ये 40% कॉर्पस परत मिळतो का.?_*


होय, कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या जोडीराच्या मृत्यू नंतर ती 40% NPS कॉर्पस रक्कम मूळ मुद्दल मुलांना /वारसांना परत मिळते..


*आता पुढे काय.? कोणता विकल्प द्यावा..?*


*_कर्मचारी म्हणून तुमची/आपली भूमिका.._*


GPS च्या अटी शर्ती येण्यासाठी काही काळ वाट बघणे अपेक्षित..


सरकारने GPS ची कार्यपद्धती जाहीर करणे अपेक्षित आहे, त्यावरून GPS मध्ये बेंचमार्क सारख्या घातक अटी आहेत की नाही हे स्पष्ट होईल.. व योग्य तुलना करून निर्णय घेता येईल..

*_त्यामुळे आपण विकल्प देण्याची घाई करू नये.._*


*संघटना म्हणून आमची भूमिका-*


जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत प्रयत्न करणे हे संघटनेचे ध्येय आहे.. मात्र सध्याच्या स्थितीत आजरोजी राज्यभर संभ्रमात असलेल्या लाखों कर्मचाऱ्यांना मदत व मार्गदर्शन करणे त्यांचे आर्थिक नुकसान न होऊ देणे हेच संघटनेचे कर्तव्य असेल.. त्यादृष्टीने..

*_१. GPS (सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना) कार्यपद्धती शासन निर्णय निर्गमित होई पर्यंत या विकल्प देण्याच्या तारखेला मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न करणे.._*

  लवकरच येत्या एक दोन दिवसात राज्य टीम मंत्रालयात जाऊन सदर विकल्प निवड तारखेला पुढे ढकलण्यासाठी निवेदन देणार आहे.. तसेच GPS कार्यपद्धती निर्गमित होण्यासाठी ही प्रयत्न करणार आहे..

*_२.कर्मचाऱ्यां पर्यंत UPS / GPS / NPS योजनेतील वस्तुनिष्ठ तुलना आकडेवारी देऊन त्यांना याबाबत पेन्शन साक्षर करवून स्वतः विकल्प निवडी साठी मार्गदर्शन करणे._*


*_३.त्यासाठी पेन्शन सॉफ्टवेअर / पेन्शन कॅल्क्युलेटर ची निर्मिती करणे_*


[ खर तर यावर काम पूर्ण झाले आहे पण GPS मध्ये बेंचमार्क कॉर्पस सारख्या काही अटी शर्ती बाबत स्पष्टता नसल्याने ते पेन्शन कॅल्क्युलेटर प्रसारित करण्यात अडचण येत आहे.. तरी त्यावर मार्ग काढून दोन्ही कंडिशन मध्ये , बेंचमार्क असेल तर आणि नसेल तर ) ते लवकरच प्रसारित करू..]


*_४.विकल्प निवड बाबत जनजागृती, मार्गदर्शन कार्यक्रम राबवणे._*


सर्व जिल्ह्यात तालुकानिहाय प्रत्यक्ष कॅम्प लावूनही संघटनेमार्फत मार्गदर्शन केले जाईल..


वरील कृती कार्यक्रम पुढील आठवड्यात राबवण्यात येतील..


                                   

मित्रांनो तूर्तास एवढेच! आपण आजही जुनी पेन्शन वर ठाम आहोत, कारण जुनी पेन्शन ची बरोबरी अन्य कोणतीही योजना करू शकत नाही.. धन्यवाद!


एकच मिशन जुनी पेन्शन..


आपलाच

विनायक चौथे

राज्य सोशल मिडिया प्रमुख

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना