डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

रणजित डिसले यांच्या अडचणीत वाढ

 जागतिक Global पुरस्कार  विजेते  शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ३४ महिन्यांच्या गैरहजेरीच्या कालावधीत मिळालेले वेतन त्यांनी स्वत:च मंजूर केल्याचे चौकशी अहवालातून उघड झाले आहे.


जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर नेमणूक होऊनही डिसले तेथे गेले नाहीत आणि मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शाळेतही उपस्थित राहिले नाहीत. असे असताना शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा भार बेकायदेशीरपणे स्वत:कडे ठेवून संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जागतिक पुरस्कार मिळवून प्रकाशझोतात आलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शिक्षक डिसले हे प्रत्यक्षात ३४ महिने शाळेत किंवा प्रतिनियुक्तीवर नेमणूक झालेल्या जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयातही गैरहजर असल्याचे उघड झाले. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशी अहवालात डिसलेंकडून ३४ महिन्यांचे जवळपास १७ लाख रुपये वेतन वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, मुळात गैरहजर असताना डिसलेंना वेतन मिळालेच कसे, आणि ते दिले कुणी, असे प्रश्न उपस्थित झाले. डिसले यांनी या कालावधीत मुख्याध्यापक म्हणून गैरहजर असताना स्वत:चे वेतन स्वत:च मंजूर केल्याचे दिसते आहे. चौकशी समितीने नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका डिसले यांच्यावर ठेवला आहे.

शिक्षक बदल्या होतील का?

वेतन मंजूर कसे झाले?

डिसले यांना वेळापूरच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर हजर होण्यासाठी नियमानुसार परितेवाडी शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर डिसले यांनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा संपूर्ण भार तेथील सेवाज्येष्ठ शिक्षक कदम यांना दिला. परंतु आर्थिक व्यवहार डिसले स्वत:च पाहात होते. या कालावधीत त्यांनी नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून येते. मुख्याध्यापक पदाचा भार बेकायदेशीरपणे स्वत:कडे ठेवून डिसले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाची फसवणूक केली आहे. स्वत:च्या अधिकारात अनधिकृतपणे त्यांनी स्वत:च्या वेतनाची उचल केल्याचे दिसून आले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्वाक्षरीही वेगवेगळी ..

कालावधीत परितेवाडी जिल्हा परिषद शाळा, वेळापूरची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेकडील शालेय अभिलेखे पाहता डिसले यांच्या स्वाक्षरीमध्ये अनेक ठिकाणी फरक असून त्यांनी वेगवेगळय़ा प्रकारची स्वाक्षरी केल्याचे दिसून येते. १३ नोव्हेंबर २०१७ ते ५ मे २०२० या कालावधीत परितेवाडी जि. प. शाळा, सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूरचे सिंहगड इन्स्टिटय़ूट आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यापैकी कोणत्याही ठिकाणी एन्ट्री मस्टर, उपस्थिती पत्रक, शेरे बुक इत्यादीपैकी एकही अधिकृत नोंद उपलब्ध झाली नाही. तसेच डिसले हे या कालावधीतील अधिकृत अभिलेखे सादर करू शकले नाहीत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षक बदल्या होतील का ?

 बदल्या संदर्भात अनेक बाबतीत संभ्रम निर्माण झालेले असून यावर श्री संतोष ताठेसर यांचे संघटनात्मक नेतृत्व दृष्टीने मांडलेले हे विचार आहेत.



📣📣📣📣📣📣📣📣

 *बदली अपडेट* 

 📣📣📣📣📣📣📣📣

*शिक्षक बदल्या होतील का ?* 

   🧐😇🤔

*शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदल्या २०२२*

*सर्वांना सस्नेह नमस्कार*🙏🏻🙏🏻

शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदली प्रक्रियेबाबत एक बातमी सध्या सगळीकडे स्प्रेड होताना दिसतेय की ...*राज्यसरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना नोव्हेंबरपर्यंत स्थगिती...*  

यावरून बऱ्याच बांधवांनी मला वैयक्तिक फोन करून विचारले की आपल्या बदल्या होतील की नाही ?

तर मी वैयक्तिक बाबतीत *९० %* पॉझिटिव्ह आहे की आपल्या बदल्या होणारच ! उर्वरित *१०% भाग* म्हणजे *५ %भाग * शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे आणि *५ %भाग* राजकीय मानसिकता यांवर अवलंबून आहे ! 


आपण आता थोड्या  नकारात्मक बाबी बघू ... त्यानंतर बदल्या होण्याची शक्यता पडताळून बघू .


नवनवीन शैक्षणिक अपडेट मिळविण्यासाठी डिजिटल youtube चॕनलला सबस्क्राईब करा...👇




*बदल्या का होणार नाहीत ?* 


१} *शैक्षणिक नुकसान -* आर.टी.ई २००९ नूसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यांसाठी शिक्षक बदल्या या शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी म्हणजे ३१ मे पूर्वी पूर्ण प्रक्रिया राबविण्यात यावी .


२} *नवीन मंत्रिमंडळाचा निर्णय -* नवीन मंत्रिमंडळाला जर हा धोरणात्मक वाटला नाही तर किंवा नवीन ग्रामविकासमंत्री यांना यांत काही तृटी वाटल्यास अडचणी येऊ शकतात .


३} *सॉफ्टवेअर* विन्सिट कंपनीचे सॉफ्टवेअर जर शासनाला अयोग्य वाटले किंवा त्यांच्या व्यवहारात जर कमी-  जास्तपणा झाला किंवा उर्वरित रक्कम टप्पा  देणे घेणे यांत काही अडचण आली तर ...याचा परिणाम होऊ शकतो .

मुख्यालय संदर्भात मोठी बातमी वाचा...

*बदल्या का होतील?*


*१} मार्च २०२२ पासून सुरू झालेली ही प्रक्रिया निरंतर संथ गतीने का होईना सुरू आहे .*


*२} मंत्रालयीन पातळीवर जी.आर - परिपत्रके काढणे,बदली समिती नेमणूक , परवानग्या घेणे, सॉफ्टवेअर निर्मिती - खरेदी - टेस्टिंग सर्व बाबी पूर्ण झालेल्या आहेत.*


*३} मंत्रालयीन पातळीवरील  कामकाज पूर्ण झालेले असून फक्त प्रशासकिय कामकाज शिल्लक आहे ते व्यवस्थितपणे सुरू आहे.*


*४} ओबीसी आरक्षणामुळे ग्रामपंचायत , जि.प निवडणुकावर परिणाम झालेला असून आचारसंहिता आड येणार नाही अपवाद नगरपरिषद निवडणुका आहेत ती बाब आपणांस लागू नाही.*


*५} फेज - १ कामकाज अगदी व्यवस्थित पूर्ण झालेले असून सोशल अपील प्रमाण अगदीच नगण्य आहे.*


*६} आंतरजिल्हा बदली साठी रोस्टर कामकाज बऱ्याच अंशी पूर्ण असून जेथे अडचण तेथे जुनेच रोस्टर वापरायचे अधिकार मा.सी.ई.ओ यांना दिलेले आहेत .*


*७} बदली स्थगितीसाठी परिपत्रक काढतांना मागील शासनाने शिक्षक वगळून काढले होते तेच सध्याच्या शासनाने नोव्हेंबर २०२२ पर्यंत कंटिन्यू केलेले दिसते .*


*८} सध्याच्या सत्ताधारी शासनाने बऱ्याच अडचणींचा सामना केल्याने मागील शासनाने घेतलेले लोकप्रिय निर्णय टाळण्याचा प्रयत्न होणार नाही.*


*९} बदलीसाठी कालावधी वाढवून घेतलेला दिसून येतो.जर बदल्या होऊ द्यायच्या नसत्या तर तात्काळ रद्द झाल्या असत्या .*


*१०} मागील २०१७ मधील बदल्यांचा आढावा घेता त्या जुलै पर्यंत झाल्या होत्या ही बाब सकारात्मक आहे.*


*तरीही बदल्यांसाठी पुढील आठवडा हा निर्णायक असणार आहे.*


*मी फक्त सकारात्मक - नकारात्मक बाबी सांगितल्या आहेत यांसाठी येणारी वेळ हीच बाब महत्त्वाची आहे .*

-

(संकलित)

संतोष ताठे  

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

गुरु माऊली नविन काव्यरचना

 






🙇🏻‍♂️            *गुरु माऊली...*


वंदन करुनी तह्यांना आज घडलो आम्ही ,

अज्ञानाची पुसुनी काजळी पेटवली  ज्ञानाची ज्योती,

शिल्पकार जीवनाचे गुरु आम्ही  सदैव  ऋणी,

भाग्य शिष्याचे उजळे हीच कार्याची प्रचिती....



उत्कर्षाच्या मार्गाचे आपण ठरला सारथी,

गौरवावी कितीच ही अनंत महंती,

आज जीवनी पाऊलोपाऊली घडतेय ख्याती,

परंपरा या नात्याची जुनी मनी आदर राहती...



यशाची गोडी लावली क्षणभर जाहला क्रोधी,

सार्थ करण्या कष्ट मनातून राहती,

विश्वगुरु दिव्यरुप या शिष्यास  बनती,

चंदनरुपी उजळे ज्ञानदानाची कीर्ती....



*माझ्या जीवनातील सर्व गुरु माऊलींना त्रिवार मानाचा मुजरा व वंदन....*💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼


   ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

           औरंगाबाद

डिसले सरांनी नोकरीचा राजीनामा दिला


 ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. माढा तालुका प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे त्यांनी पोस्टाद्वारे आपला राजीनामा दिला आहे. अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती घेऊन पुढील शिक्षणासाठी 8 ऑगस्ट रोजी रवाना होण्याआधी डिसले गुरुजींनी राजीनामा दिल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. शिक्षक रणजीतसिंह डिसले ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

डिसले सरांच्या कार्याचा गौरव ग्लोबल पुरस्कार मिळण्याआधी
दीडवर्ष पुर्वी प्रकाशसिंग राजपूत यांच्या राष्ट्रीय स्तरावरील
दैनिक  लोकमतच्या संपादकीय पानावरील लेखात केलेला आहे.



2022 च्या जानेवारी महिन्यात शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी तब्बल 3 वर्षे डिसले गुरुजी अनुपस्थित असल्याचा आरोप केला होता.

2021 मध्ये अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर.. ग्लोबर टीचर अवॉर्ड विजेते सोलापुरातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले
यांना आता अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर झाली होती. अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली होती. ही प्रतिष्ठेची असलेली स्कॉलरशिप संपूर्ण जगभरातील एकूण 40 शिक्षकांना यंदा देण्यात आली होती. 

लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत. याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजींनी सांगितले. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती.



मुख्यालय बाबत फार मोठी बातमी

 नांदेडमधील अर्धापूर पंचायत समितीच्या तब्बल 319 कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 156/3 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करा, असा निकाल अर्धापूर न्यायालयाचे न्यायाधीश एम डी बिरहारी यांनी दिला आहे. 



या कार्यवाहीत शिक्षक आणि ग्रामसेवक यांचा मोठा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी केस दाखल केली होती. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाहीची ही राज्यातील मोठी घटना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बदलीबाबत शिक्षक गेले कोर्टात

अर्धापूर पंचायत समिती अंतर्गत असलेले अनेक कर्मचारी विशेषतः शिक्षक आणि ग्रामसेवक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलत असल्याची माहिती उघड झाली. 

यानंतर आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी अनेक तक्रारी करुन मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. दरम्यान तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीसाठी टाळाटाळ होत होती.

 

पार्डी म. येथील रहिवासी असलेले आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनुस पार्डीकर यांनी 8 जानेवारी 2020 रोजी मुख्यालयी न राहणाऱ्या आणि घरभाडे भत्ता नियमित उचलणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी करु दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. 

या दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी  मिना रावताळे यांनी दिले होते. त्यावरुन धरणे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नव्हती. 

त्यामुळे दरम्यानच्या काळात आरटीआय कार्यकर्ते सय्यद युनुस पार्डीकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करुन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, अर्धापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. अर्धापूर पंचायत समिती कार्यालयातील 319 कर्मचारी मुख्यालयी न राहता खोटे कागदपत्रे सादर करुन प्रति माह अंदाजे 14 ते 15 लाख रुपये प्रमाणे दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये शासनाकडून उचलत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. 

या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. ए आर चाऊस यांच्या माध्यमातून अर्धापूर न्यायालयात संबंधित प्रकरण 30 मार्च 2022 रोजी सय्यद युनूस यांनी दाखल केले होते. 

न्यायालयासमोर सर्व सत्य बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर 319 कर्मचाऱ्यांविरुद्ध 7 जुलै 2022 रोजी 156/3 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश न्यायाधीश एम डी बिरहारी यांनी दिले आहेत.  


वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी

तमाम भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐जय हरि विठ्ठल🙏🏼🙏🏼🙏🏼*



वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी


धाव पाऊलांची गवसे पंढरी,

विठु रुखमाई दर्शनास वारी,

पावन होऊन जीवन उद्धारी ,

अखंड भक्तीची आस ही भारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



साज भक्तांवर भक्तीचा जरी,

आत्मशांती लाभे या नगरी,

विठुरायाची सजूनी  पंढरी,

सार्थ होण्या भक्ताची वारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



हरिनामाची जपुनी माळ जरी,

तीर्थरुपी सावली विठ्ठल धरी,

भक्तांची बनुनी माय माऊली,

गर्जे नभ कडकडाडे वीज जरी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



 *काव्यलेखन*

     ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

         औरंगाबाद 

📲  9960878457

हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...

माझी नविन रचना आपणांस सादर करत आहे.




 *हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...*



हळव्या मनास साथ नवा दे,

प्रीत ही आनंदाने सजवू दे,

धीर नवा गवसला जीवनी गं,

तुझ्या मनी माझं ही मन रमू दे...



साथ तुझी हिच आस मला दे,

चैतन्याचे भावविश्व माझे बनू दे,

गंभीर तु अशीच का वागते गं,

हरपून मी  तुझ्यात प्रतिबिंब दिसू दे...




श्रावण सरी बनून भावना चिंब  होऊ दे,

तुझा स्पर्श या भावनांना ही कधी होऊ दे,

प्रेमाचा माझा ही ग्रंथ लिहून गं,

आठवणींना साज जीवनी मला दे...



दुरावते तुही वेळ कठीण सुलभ होऊ दे,

 स्वप्नं आयुष्याचे माझे ही पुर्ण होऊ दे,

हिरावून तु क्षण माझा जरी गं,

हृदय दाटले तरी तुझीच प्रीत मिळू दे...



      ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️ 

            औरंगाबाद

9960878457