डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 140 वा

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 140 वा*


डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र च्या वतीने नुतनवर्षाच्या 💐💐💐🌹🌹🌹 खूप खूप शुभेच्छा !!! 

प्रकाशसिंग राजपूत 
मुख्यप्रशासक व समूहनिर्माता 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

 दिनांक.०१/०१/२०२४ 

भारतीय सौर १०, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.आज पासून ही माहिती देण्यात येईल.

वार:-सोमवार

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


Today's almanac

Dated.01/01/2024

 Indian Solar 10, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.

 Day:-Monday

 Ayana-Uttarayana

 Ritu - Hemant Ritu

 The holy month of Muslims "Jamadilakhar"

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सोमवार, 01 जानेवारी 2024

सूर्योदय 07:07, 

खगोलीय दुपार: 12:38, 

सूर्यास्त: 18:09, 

दिवस कालावधी: 11:02, 

रात्र कालावधी: 12:58.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*सुविचार* 

कोणत्याही विजयासाठी नम्रता हवीच.

Good Thought

“You don’t have to be great to start, but You have to start to be great.” – Zig Ziglar

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

१८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.

१८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.

१८९४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)


१९४३: शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.


special day

 1848: Mahatma Jotiba Phule and Savitribai Phule started the first girls' school at Bhide Wada Pune.

 〉

 1862: Indian Penal Code came into existence.

 1894: Indian physicist Satyendranath Bose born.  (Death: 4 February 1974)


 1943: Birth of Raghunath Mashelkar, Scientist, Director General of Council of Scientific and Industrial Research, Padma Shri, Padma Bhushan winner.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

म्हणी/proverb

 माकडाच्या हाती कोलीत

A fireband in the hand of madman

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

असा सुळकं इकडे तिकडे पळतो

 मी फक्त पाण्यातच राहू शकतो!

:-मासा


Puzzle

I run here and there with speed

I can live only in water

Who I am?

:-Fish

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

दुधाचा पेला

  एके दिवशी हरी शाळेतून घरी आला आणि त्याला अचानक खूप भूक लागली. त्याला माहित होते की आज आईने स्वयंपाक केलेला नाही. तो भुकेने व्याकुळ झाला आणि एका घरातून दुसऱ्या घरात जेवण मागू लागला. शेवटी एका मुलीने त्याला दुधाचा मोठा ग्लास दिला. जेव्हा हरी पैसे देऊ लागला तेव्हा तिने ते नाकारले आणि त्याला परत पाठवले. बऱ्याच वर्षांनंतर, ही मुलगी जी आता प्रौढा झाली होती, आजारी पडली. बऱ्याच डॉक्टरांना दाखवूनही तिच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. शेवटी ती शहरातल्या नामवंत डॉक्टर सोबत, मोठ्या इस्पितळात गेली. डॉक्टरांनी काही महिने तिच्यावर उपचार केले आणि ती बरी झाली. ती खूप आनंदून गेली पण बिलाचे पैसे भरता येणार नाही ह्या विचाराने मनातून धास्तावली. जेव्हा हॉस्पिटलकडून तिच्या हातात बिलाचा लिफाफा आला तेव्हा तिने तो उघडला त्यावर लिहिलेली अक्षरे होती "रक्कम मिळाली,एका दुधाच्या पेल्यातून!" तात्पर्य: चांगले काम कधीच वाया जात नाही.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Moral story

The Golden Touch of Midas

Once upon a time, there was a Greek King, Midas.

He was very rich and had lots of Gold. He had a daughter, who he loved a lot.

One day, Midas found an angel in need of help. He helped her and in return she agreed to grant a wish.

Midas wished that everything he touched would turn into gold. His wish was granted

On his way home, he touched rocks and plants and they turned into gold.

As he reached home, in excitement he hugged his daughter, who turned into gold.

Midas was devastated and he had learnt his lesson. Upon learning his lesson, Midas asked the angel to take his wish away.



Moral of the story

Greed is not good for you. Be content and satisfied to lead a happy and fulfilling life

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान-संकलन ज्ञानराज दरेकर

०१) नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे ?

- रवींद्रनाथ टागोर.


०२) लॅटीन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय ?

- मानव.


०३) नर्मदा नदीचा उगम कोणत्या राज्यात आहे ?

- मध्यप्रदेश.


०४) कोणत्या प्राण्याला "वाळवंटातील जहाज"असे म्हणतात ?

- उंट.


०५) "सारे जहाँ से अच्छा" हे गीत कोणी लिहिले आहे ?

- मोहम्मद इकबाल.


General Knowledge-Compilation by Gnanraj Darekar

 01) Who is the first Indian to win Nobel Prize?

 - Rabindranath Tagore.


 02) What does the word homo mean in Latin?

 - Human.


 03) Narmada river originates in which state?

 - Madhya Pradesh.


 04) Which animal is called "ship of desert"?

 - Camel.


 05) Who wrote the song "Sare Jahan Se Achcha"?

 - Mohammad Iqbal.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

पृथ्वीयां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्।

मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते।।

अर्थ:- या पृथ्वीवरती तीन रत्न आहेत ती म्हणजे पाणी अन्न आणि सुभाषित म्हणजेच गोड वचने मात्र मूर्ख लोक दगडांना म्हणजेच हिऱ्यामोत्यांनाच रत्नाची उपमा देत राहतात.

Meaning:-on Earth, there are three precious things – water, food, and good speech. However, fools consider fragments of gems to be most valuable.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*सर्वांना येणारे 2024 हे वर्ष सुख समृद्धी आनंद आणि भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा🙏💐*


*May the year 2024 be filled with happiness,  prosperity to all.💐🙏*

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शालेय परिपाठ दिवस 139

 *चला सोपा करूया परिपाठ*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -३० डिसेंबर २०२३

वार:-शनिवार

तिथी:-मार्गशीर्ष कृ ४ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "



Today's almanac

 Date - 30 December 2023

         Saturday

 Tithi-Margshirsh krushna 4 shak 1945

 Ayana-Uttrayana

 Season:-pre-winter season


"Jamadilakhar"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 शनिवार, 30 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:06, 

खगोलीय दुपार: 12:37, 

सूर्यास्त: 18:08, 

दिवस कालावधी: 11:02, 

रात्र कालावधी: 12:58.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*सुविचार* 

*जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.*

Good Thought

“Learning is never done without errors and defeat.” – Vladimir Lenin

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*दिनविशेष*

१)१९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.


२)१९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.


३)१९३४: हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट २००५)


४)१९५०: सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.


*Day Special*

 1)1924: Edwin Hubble announced the existence of galaxies other than the Milky Way.


 2)1943: Subhash Chandra Bose unfurled the Indian independence flag at Port Blair.


 3) 1934: Hubble Space Telescope co-creator John N.  Birth of Bahakal.  (Death: 17 August 2005)


 4) 1950: Birth of Björn Strastrup, father of C++ programming language.


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*आजची म्हण व अर्थ*

आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?- स्वतःजवळ नाहीतर तो दुसऱ्यास काय देणार ?

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*आजचे कोडे*

छगन आणि मगन हे दोघे मित्र आहेत

छगनच्या कोंबडीने मगनच्या घरी जाऊन अंडी दिली,

तर मग अंडी कोणाची छगनची कि मगनची?


⇒ उत्तर: अंडी तर कोंबडीचीच राहणार ना.



दोन अक्षरांचे माझे नाव, डोकं झाकणे माझं काम?

ओळखा पाहू मी कोण?


=> टोपी

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*बोधकथा*


फासेपारधी व पक्षी

एका पारध्याने शेतात पक्षी धरण्यासाठी आपले जाळे पसरून ठेवले व तो एका झाडाआड लपून जाळ्यात पक्षी कसे काय सापडतात ते पहात बसला. काही वेळाने एकामागून एक पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले. ते थोडा वेळ तेथे बसत आणि उडून जात. याप्रमाणे थोडे थोडे पक्षी तेथे दिवसभर येत होते. पण ते अगदी थोडे असल्यामुळे त्यांना पकडावे असे त्या पारध्याला वाटले नाही. खूप पक्षी एकदम पकडावे असे त्याच्या मनात होते. शेवटी संध्याकाळ झाली व सगळे पक्षी आपापल्या घरट्यात निघून गेले. मग निराश होऊन त्या पारध्याने जाळे काढून घेतले व नशिबाला दोष देत तो घरी गेला.


तात्पर्य


- कोणत्याही कामात उतावीळपणा जसा चांगला नाही त्याप्रमाणे दिरंगाईही योग्य नाही.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*सामान्य ज्ञान प्रश्न*


1)भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?

उत्तर : अरुणाचल प्रदेश


2) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?

उत्तर : मधुमेह


3) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?

उत्तर : आसाम


4) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?

उत्तर : चीन


5) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?

उत्तर : सिद्धार्थ


*General Knowledge Questions*


 1) In which state does the sun rise first in India?

 Answer: Arunachal Pradesh


 2) Insulin is used to treat which disease?

 Answer: Diabetes


 3) Bihu is a famous festival of which state?

 Answer: Assam


 4) Which country invented paper?

 Answer: China


 5) What was the childhood name of Gautama Buddha?

 Answer: Siddharth


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्त्रं तस्य करोति किं।

लोचनाभ्याम विहीनस्य, दर्पण: किं करिष्यति।।

अर्थ:-ज्या माणसाला स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी, जाणीव आणि समज नाही, त्याला शास्त्र काय करू शकेल?  जसे की डोळे नसलेल्या माणसासाठी आरसा काय करू शकतो?

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शालेय परिपाठ दिवस 137 वा

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस 137 वा*


डिजिटल समूहासाठी कोरोना काळातील विद्यार्थ्यांना मोफत चित्रकला क्लास घेणारे शिवराज सर अभिनेता विकी कौशलला त्यांचे चित्र भेट देतांना....


शालेय परिपाठ 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -२८ डिसेंबर २०२३

वार:-गुरूवार

तिथी:-मार्गशीर्ष कृ २ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "


Today's almanac

 Date - 28 December 2023

         Thursday

 Tithi-Margshirsh krushna 2 shak 1945

 Ayana-Uttrayana

 Season:-pre-winter season


"Jamadilakhar"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 गुरुवार, 28 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:05, 

खगोलीय दुपार: 12:36, 

सूर्यास्त: 18:07, 

दिवस कालावधी: 11:02, 

रात्र कालावधी: 12:58.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

नेहमी तीन गोष्टी देत राहा. मान, ज्ञान, आणि दान.


Good thought

“The way to get started is to quit talking and begin doing.” – Walt Disney

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

हुतात्मा शिरीशकुमार यांचा जन्म 1926


म्हणी/proverb

Money makes the mare go.

दाम करी काम

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

चिरून धुतले भाजीला तर आम्ही विरघळतो पाण्यात

होते कमी  पोषकता भाजी ची

काही क्षणात

ओळखा पाहू मी कोण?

:-क्षार व जीवनसत्वे

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

एकदा एक श्रीमंत माणूस नदी काठावरील मंदिरात देव दर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देव दर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरु झाली .तो ओरडू लागला पण त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे येईना. 

अखेर एका साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रुपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. त्यांनी त्या व्यापाऱ्याला  उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले.

साधू म्हणाला, 'थांबा, त्याने स्वतःच्या किमती एवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.'

"माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकार कर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे."

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान (संकलन ज्ञानराज दरेकर)

०१) कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान असलेला घाट कोणता ?

- आंबा घाट.


०२) उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- बुलढाणा.


०३) महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक आहे ?

- दुसरा.


०४) महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो ?

- तिसरा.


०५) बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

- पाच.


General Knowledge ( by Dnyanaraj Darekar)

 01) Which is the Ghat between Kolhapur and Ratnagiri?

 - Mango Ghat.


 02) In which district is Lonar Sarovar formed due to meteorite?

 - Buldhana.


 03) What is the number of Maharashtra in terms of population in India?

 - Second.


 04) What is the number of Maharashtra in terms of area in India?

 - the third.


 05) Out of twelve Jyotirlingas, how many Jyotirlingas are there in Maharashtra?

 - Five.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

न चोरहार्य न राजहार्य न भ्रतृभाज्यं न च भारकारि।


व्यये कृते वर्धति एव नित्यम विद्याधनम सर्वधनप्रधानम्।।


अर्थ:- ते चोरल्या जाऊ शकत नाही, राजा तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही, भाऊबंदकी मध्ये विभागले जाऊ शकत नाही आणि त्याचे कधीही ओझे वाटत नाही.

उलट इतरांना दिल्याने ते नेहमीच वाढत राहते असे विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शालेय परिपाठ दिवस 135 वा

 चला सोपा करूया परिपाठ 

*दिवस 135 वा*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

२६ डिसेंबर २०२३

वार:-मंगळवार

तिथी:-मार्गशीर्ष शु १५ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "


Today's almanac

 Date - 26 December 2023

         Tuesday

 Tithi-Margshirsh Shu 15 shak 1945

 Ayana-Uttrayana

 Season:-pre-winter season


"Jamadilakhar"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 मंगळवार, 26 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:05, 

खगोलीय दुपार: 12:35, 

सूर्यास्त: 18:05, 

दिवस कालावधी: 11:00, 

रात्र कालावधी: 13:00.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,

समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.


Good thought

No matter how great the storm at sea,

 The sea never leaves its calm.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*दिनविशेष*

1.१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.

2 वीर बाल दिवस

*Day Special*

 1.1898: Marie Curie and Pierre Curie first isolated the element radium.

 2 Veer Bal Diwas

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*आजची म्हण व अर्थ*

आजा मेला नि नातू झाला:

एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार.


*आजचे कोडे*

कोणता तो चेहरा…

सकाळपासून संध्याकाळ पर्यंत..

आकाशाकडे पाहत राहतो हसत…

उत्तर :- सूर्यफूल 


*Today's Riddle*

 What is that face?

 From morning to evening..

 Keeps smiling at the sky...

 Answer :- Sunflower

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*बोधकथा*

*श्रीमंत व्यापारी*

एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. 


तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला. 


तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. 


एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले. 


अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, "मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे."


तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, "तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.


आत्मा म्हणाली, "माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे."


"तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही." एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली. 



तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

०१) किसन बाबुराव हजारे यांचे टोपण नावा कोणते आहे ?

- अण्णा हजारे.


०२) 'कोण बनेगा करोडपती 'या प्रसिद्ध टीव्ही सिरीयल चा अँकर कोण आहे ?

-  सुपरस्टार अमिताभ बच्चन.


०३) भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण  होते ?

- जवाहरलाल नेहरू 


०४) भारतीय राष्ट्रीय ध्वजात किती रंगाचे पट्टे आहे ?

 - तीन.


०५) चादरीकरीता ष्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

 - सोलापूर.

general knowledge

 01) What is the nickname of Kisan Baburao Hazare?

 - Anna Hazare.


 02) Who is the anchor of the famous TV serial 'Kon Banega Crorepati'?

 - Superstar Amitabh Bachchan.


 03) Who was the first Prime Minister of India?

 - Jawaharlal Nehru


 04) How many color stripes are there in Indian national flag?

  - Three.


 05) Which is the famous place for Chadar?

  - Solapur.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

काक चेष्टा, बको ध्यानं, स्वान निद्रा तथैव च।

अल्पहारी, गृहत्यागी, विद्यार्थी पंच लक्षणं।।


अर्थ

शिकण्यासाठी कटिबद्ध असलेल्या विद्यार्थ्यामध्ये ही पाच वैशिष्ट्ये असली पाहिजेत - कावळ्यासारखे सगळीकडे लक्ष असणे, बगळासारखे ध्यान करणे, कुत्र्यासारखे सावध झोपणे, आळस येणार नाही असे अल्प खाणे आणि शिकण्यासाठी घर सोडण्याची तयारी

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

शालेय परिपाठ दिवस 134 वा

 चला सोपा करूया परिपाठ

Good Thought


*दिवस 134 वा*

*संकल्पना व लेखिका*

*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*

मोबाईल नंबर 9130958046

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

२३ डिसेंबर २०२३

वार:-शनिवार

तिथी:-मार्गशीर्ष शु ११ शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-उत्तरायण

ऋतू - हेमंत ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "



Today's almanac

 Date - 23 December 2023

         Saturday

 Tithi-Margshirsh Shu 11 shak 1945

 Ayana-Uttrayana

 Season:-pre-winter season


"Jamadilakhar"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 शनिवार, 23 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:08, 

खगोलीय दुपार: 12:37, 

सूर्यास्त: 18:07, 

दिवस कालावधी: 10:59, 

रात्र कालावधी: 13:01.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी गोष्ट म्हणजे माणुसकी.

good thought

 The only great thing in the world that cannot be measured in any scale is humanity.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


दिनविशेष

२००४: भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२१)


Day special

2004: Death of Narasimha Rao, 9th Prime Minister of India, Minister of Commerce and Industry.  (Born: 28 June 1921)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

म्हणी/proverb

cowards may die many times before there death -भित्यापाठी ब्रह्मराक्षस

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

मी खात पित नाही आणि पगार पण घेत नाही तरी सुद्धा तुमच्या घराला पहारा देतो, सांगा बर मी कोण?


⇒ उत्तर: कुलूप


I don't eat or drink and I don't get salary but I guard your house, tell me who am I?


 ⇒ Answer: Lock

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

०१) कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो ?

- ऑस्ट्रेलिया.


०२) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे ?

- दिल्ली.


०३) "गुलाबी शहर" म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?

- जयपूर.


०४) भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?

 - २६ जानेवारी.


०५) भारताच्या दक्षिणेस असलेला महासागर कोणता आहे ?

- हिंदी महासागर.


General knowledge

 01) Kangaroo is found in which country?

 - Australia.


 02) Red Fort is located in which city?

 - Delhi.


 03) Which city is known as "Pink City"?

 - Jaipur.


 04) Which day is celebrated as Republic Day in India?

  - 26 January.


 05) Which is the ocean south of India?

 - Indian Ocean.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

एका पेन्सिलीची गोष्ट

  राज अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली. विचारात पडलेल्या राज ने आजी कडे पहिले आणि म्हणाला "माझ्या परीक्षेतील खराब कामगिरी नंतर मी पेन्सिल घेण्यास पात्र नाही." आजीने समजावले," तू ह्या पेन्सिल कडून खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतोस, कारण ती तुझ्यासारखीच आहे, ती पण धार लावून घेण्याचा वेदनादायी अनुभव घेते, अगदी तसाच जसा तू तुझा परीक्षेत खराब कामगिरी केल्याचा घेतला आहेस! तरीही ती तुला चांगला विद्यार्थी घडवण्यास मदत करणार आहे. ज्याप्रमाणे हे पेन्सिल च्या आतून येते त्याप्रमाणे तुलाही अडथळ्यांना पार करण्याचा बळ तुझ्यातच सापडेल. आणि शेवटी ज्याप्रमाणे पेन्सिल कुठलीही पृष्ठभागावर आपला ठसा उमटवते, त्याचप्रमाणे तुही जे काही करायला घेशील त्यावर तुझा ठसा राहील.” राजला लगेच बरं वाटलं आणि त्याने स्वतःला वचन दिले की तो इथून पुढे चांगली कामगिरी करेल. तात्पर्य: आपल्या सगळ्यांमध्ये आपल्याला हवं ते बनण्याची क्षमता असते.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्लोक

काव्य-शास्त्र-विनोदेन कालो गच्छति धीमताम्।

व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा॥

:-जे विद्वान असतात ते काव्य,शास्त्र इत्यादी विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ देतात तर मूर्ख लोक हाच वेळ व्यसने,झोप काढणे आणि वादविवाद करणे यात घालवतात.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

आंतरजिल्हा बदलीचा ईमेल कसा असणार |inter district|online transfer| ottmaha|

 आंतरजिल्हा बदली अपडेट inter district transfer 



        आपल्या  gmail ला


उदयाला.....

जर बदली झाली तर


Your inter district transfer has been done as per your request...


असा मेल येईल....


आणि बदली नाही झाली तर...

You have not been transferred because vacancy is not available for choice you have given...


असा मेल येईल....



          रोस्टर नुसार रिक्त पदे असणार्‍या व साखळी होणार्‍या जिल्ह्यात  बदल्या झालेल्या शिक्षकांना व ज्यांची बदली होणार नाही त्यांना सुद्धा मेल येईल. 



            

 *माहितीस्तव*

शालेय परिपाठ दिवस 133 वा | moral story | good thoughts |

 चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 133 वा*

good thoughts

*संकल्पना व लेखिका*

*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*

मोबाईल नंबर 9130958046

*गणितीय परिपाठ*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -

२२ डिसेंबर २०२३

वार:-शुक्रवार

तिथी:-मार्गशीर्ष शु १० शके १९४५

 शिवराज शक 350

अयन-दक्षिणायण

ऋतू - शरद ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "



Today's almanac

 Date - 22 December 2023

         Friday

 Tithi-Margshirsh Shu 10 shak 1945

 Ayana-Dakshinayana

 Season:-Autumn season


"Jamadilakhar"  month of Muslims 


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

 शुक्रवार, 22 डिसेंबर 2023

सूर्योदय 07:08, 

खगोलीय दुपार: 12:37, 

सूर्यास्त: 18:06, 

दिवस कालावधी: 10:58, 

रात्र कालावधी: 13:02.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

जीवनाचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो चिन्हांचा वापर.


Good Thought

“Mathematics is the language with which God has written the universe.” – Galileo Galilei


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*दिनविशेष* 

*राष्ट्रीय गणित दिन* (थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस) 1887


शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांचा जन्म 1666


भारतातील  विश्व भारती विद्यापीठ सुरू झाले.1921

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*आजची म्हण व तिचा अर्थ*

गणिती शब्द असलेल्या म्हणी

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे

झाकली मूठ सव्वा लाखाची

पळसाला पाने तीनच

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

Proverb

Two is company,three is crowd.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर सतत बदलतच राहते?


⇒ उत्तर: वेळ काय झाली आहे?


🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚


 *बोधकथा* 

*सोनेरी शिंगाचे  हरिण*


            एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.

 

          एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि  मागे  वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.


          शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.

हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच  पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले



 तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत .

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*सामान्य ज्ञान*

1. भारतीय गणिताचे राजकुमार असे कोणाला म्हटले जाते?

उत्तर:- श्रीनिवास रामानुजन.

2.गणिताचे जनक कोण आहेत?

उत्तर:-आर्किमिडीज

3)शून्याचा शोध कोणी लावला?

उत्तर:-आर्यभट्ट

4)तुमच्या वर्गात कोणत्या आकाराचा बोर्ड आहे?

उत्तर:-मुले आपल्या वर्गात असलेल्या बोर्डचा आकार सांगतील.

5. चालू महिना किती दिवसांचा आहे?

उत्तर:-31

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

*दिन विशेष माहिती*

राष्ट्रीय गणित दिन म्हणजे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस. पूर्वतयारीसाठी दोन दिवसांपूर्वीच्या परिपाठामध्ये मी रामानुजन यांची माहिती दिली होती. तरीसुद्धा आज पुन्हा एकदा तीच माहिती इथे देत आहे.

रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील इरोड या छोट्याशा गावी झाला. पुढे जागतिक कीर्तीचा महान गणितज्ञ ठरला. ही गोष्ट भारतीयांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आहे.

रामानुजन यांचे वडील श्रीनिवास अयंगार एका कापड दुकानात मुनीम म्हणून काम करत होते तर आई कोमलता ही धार्मिक होती. रामानुजन खूप एकलकोंडा होता. हा घरात एकटाच राहत असे त्याला स्पष्टपणे बोलता येत नव्हते. त्याच्या आईला आपला मुलगा मतिमंद आहे की काय असे भीती वाटत असे. मात्र आईच्या माहेरी गेल्यानंतर वडिलांनी रामानुजनला शाळेत दाखल केले. कुंभकोनम येथे त्याला शाळेची गोडी लागली. गणित विषयात त्याला शंभर पैकी शंभर गुण मिळू लागले. वयाच्या पाचव्या वर्षी तो मोठमोठ्या अंकांची बेरीज, वजाबाकी सहजपणे करायचा. विशेष म्हणजे तोंडी बरोबर सांगत असे. प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. आणि वडिलांची इच्छा आपल्या मुलाने इंग्रजी शिकावे अशी होती म्हणून त्याला 'टाऊन हाय' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. ही शाळा खूप सुंदर होती. या शाळेने रामानुजन पुढे नावारुपाला आला.वयाच्या सातव्याच वर्षी रामानुजन हायस्कूलमध्ये दाखल झाला. या शाळेतील शिस्तशिर वातावरण पाहून त्याला सुरुवातीला खूप दडपण आले.तो मुळात शांत स्वभावाचा होता. मित्रांमध्ये फारसे मिसळायला त्याला आवडत नसे. फक्त आपला अभ्यास आणि आपण असा त्याचा स्वभाव बनला होता. त्यामुळे फारसे मित्र नव्हते. एके दिवशी शिक्षक वर्गात शिकवत होते. ते म्हणाले, "कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भाग दिला तर उत्तर एक येते."

 मुलांना ही संकल्पना अधिक स्पष्ट व्हावी म्हणून त्यांनी उदाहरण दिले.

 तीन फळे तीन जणांमध्ये वाटली तर प्रत्येकाला एक फळ मिळेल.

 हजार फळे हजार जणांमध्ये वाटली तरी प्रत्येकाला एकच फळ मिळेल.

 म्हणजे समान संख्येला समान संख्येने भाग दिला तर उत्तर एक येते.

 शिक्षकांच्या सांगण्यात रामानुजनला कुठेतरी कमतरता जाणवत होती सरांचे सांगून झाल्यावर तो उभा राहिला आणि त्याने सरांना विचारले, "सर, शून्याला शून्याने भागले तरी उत्तर एक येईल का?"

 रामानुजनच्या या प्रश्नाने सरांना विचारात पाडले. त्यांनी याबाबत असा विचारच केला नव्हता. मग रामानुजन आणखी पुढे म्हणाला, "याचा अर्थ सर, कुठलंच फळ कुठल्याच व्यक्तीला वाटलं नाही तरी उत्तर एक येईल का?"

 आता मात्र शिक्षकांबरोबरच मुलेही सावध झाले. मुलांना रामानुजनचा तर्क पटला होता. ते आपापसात कुजबुजू लागले. आतापर्यंत वर्गात दुर्लक्षित असलेल्या रामानुजन कडे सर्व वर्गाचे लक्ष गेले. त्यांना रामानुजन मधील चुणूक लक्षात आली. थोडासा बावळट ,एकलकोंडा वाटणारा हा मुलगा चांगला हुशार आहे हे त्यांच्या लक्षात आले. रामानुजन यांची कौटुंबिक परिस्थिती चांगली नसल्याने ते आपल्या घरी विद्यार्थ्यांना पेइंग गेस्ट म्हणून ठेवत. त्यापैकी दोन मुले कॉलेजात होती. रामानुजन त्यांची गणिताची पुस्तके वाचत. रामानुजन यांची गणितातील आवड पाहून त्यांनी आपल्याकडील गणिताचे ज्ञान त्याला दिले. ते त्यांच्याकडील गणिताची पुस्तके त्याला वाचायला देत. रामानुजन एक पुस्तक वाचून झाले की दुसरे त्यांना ग्रंथालयातून आणायला सांगे. एवढी अवघड पुस्तके आपल्याला समजतच नाहीत, तेव्हा हा मुलगा काय समजेल असे त्यांना वाटले. एक दिवस त्यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी काही कठीण गणिते सोडवण्यासाठी दिली. रामानुजन यांनी ती चटकन सोडवली. त्या मुलांना त्याच्या गणिती बुद्धिमत्तेची चमक लक्षात आली. त्यांनी त्यांना माहीत असलेली गणित रामानुजनला शिकवली. रामानुजन च्या ज्ञानात रोज भरत भर पडत होती. अजून कॉलेजात न गेलेला रामानुजन कॉलेजच्या पुस्तकातील गणिते भराभर सोडवू लागला. रामानुजन जेव्हा त्या मुलांना कॉलेजच्या ग्रंथालयातून पुस्तके आणायचा आग्रह करू लागला, त्यावेळी त्याला एस.एल. लोणी यांनी लिहिलेले ट्रिग्नोमेट्री(त्रिकोणमिती) हे पुस्तक आणून दिले. हा विषय रामानुजनला नवा होता. काटकोन त्रिकोणातील दोन बाजू दिल्या असतात तिसरी बाजू काढणे, त्रिकोणाच्या दोन बाजूंचे गुणोत्तर मांडणे, त्रिकोणमितीचा उपयोग करून ध्वज स्तंभाची उंची काढणे,समुद्रातील जहाजाचे दीपस्तंभ पासूनचे अंतर काढणे या गोष्टी त्याला खूप रंजक वाटल्या. त्याने हा विषय मोठ्या आवडीने अभ्यासला. पुढे जी.एच. कार यांचे पुस्तक त्याच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. या पुस्तकातील तब्बल सहा हजार समीकरणे त्यांनी सोडवली. लेखक जी.एस. कार हे लंडनमध्ये खाजगी क्लासेस घेत असत. ते रामानुजन प्रमाणेच निर्धन होते. त्यांनी देखील मोठ्या श्रमाने अभ्यास करून वयाच्या 40 व्या वर्षी केंब्रिज विद्यापीठाची ट्रायपास परीक्षा दिली होती. या पुस्तकात उदाहरणाचे स्पष्टीकरण दिले नव्हते. उत्तर कसे काढले हे स्पष्ट केले नव्हते. असे असले तरी रामानुजन यांनी हे आव्हान स्वीकारले. यातील सर्वच्या सर्व उदाहरणे सोडवायला सुरुवात केली. झपाटून गेल्यासारखा गणित सोडवत राहिला. जवळपास 4400 प्रमेयांची सिद्धता त्याने सोडवून काढली. गणितातील 'मॅजिक स्क्वेअर' ही संकल्पना ही रामानुजन यांनी सोडून घेतली. कॉलेजमध्ये जाण्याआधीच रामानुजन नावारूपाला आला होता. हायस्कूल मधील अंतिम वर्षाच्या परीक्षेत तो संपूर्ण जिल्ह्यातून पहिला आला. तो आपल्या जीवनाचा सोनं करेल असे साऱ्यांना वाटत होते. पण पुढे घडले ते मात्र वेगळेच. त्याच्या बाबतीत नियतीला काही वेगळेच करायचे होते. शाळेत असताना तो इतर सर्व विषयांचा अभ्यास करायचा मात्र कॉलेजात आल्यापासून त्याला गणितशिवाय इतर कोणत्याही विषयात रुची वाटत नव्हती. त्याचा संपूर्ण कल गणिताकडे होता. इतर विषयांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी तो कॉलेजात नापास झाला. त्याची शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे त्याला कॉलेज शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. पुढे मद्रास विद्यापीठात त्याला कॉलेजात प्रवेश मिळाला. रामानुजन गणितात दैवदत्त देणगी मिळालेला प्रज्ञावान विद्यार्थी होता. परंतु शिक्षण व्यवस्थेच्या परंपरेत बसत नव्हता. खरंतर अशा प्रकारे कोणतेही कॉलेज त्याचे मूल्यमापन करू शकत नव्हते. त्यावेळी त्याचे मोठेपण त्यांना कळले नाही असेच म्हणावे लागेल. नापास झाल्यामुळे त्याच्या कॉलेज शिक्षणाला कायमचा राम राम मिळाला. हातात पदवी नसल्याने त्याला नोकरी नव्हती. परिस्थिती हलाखीची होती. कधी कधी उपाशी राहावे लागे. तो सारखा इन्फिनिटी बद्दल बोलत राहायचा. कॉलेजातून काढून टाकल्यावर देखील तो दिवसातील बराच वेळ घराच्या ओट्यावर बसून हातात पाटी घेऊन सारखी गणित करत राहायचा.यात तो इतका मग्न झालेला असायचा की घराजवळून जाणारी बायामाणसे,त्यांचा आवाज, बैलगाड्यांचा आवाज, खेळणाऱ्या मुलांचा गोंधळ या कसल्याही गोष्टी त्याला विचलित करत नव्हत्या. गल्लीत खेळणाऱ्या मुलांकडे तो शून्य नजरेने पहात असे. पण त्याचवेळी त्याच्या आत मध्ये काहीतरी खळबळ चाललेली असायची. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणिते सोडवायचा. काही काळानंतर त्याने वहीवर गणिते मांडायला सुरुवात केली. अगोदर तो पेन्सिलने लिहीत असे. नंतर निळ्या पेनाने. त्यानंतर लाल शाईच्या पेनाने लिहीत असे. अशाप्रकारे एकच कागद तो दोन-तीनदा वापरत असे. जन्मापासूनच धार्मिक वृत्तीचा संस्कार असल्याने त्याची देखील नमगिरीदेवीवर श्रद्धा होती. नमगिरी देवी स्वप्नात येऊन आपल्याला नवीन प्रमेय सूत्रे सांगत असते असे तो म्हणे. समीकरण करण्यात ही त्याला असेच दिसे. तो आपल्या मित्रांना नेहमी सांगत असे "an equation means nothing to me unless it express a thought of god."

 ज्या समीकरणात दैवी विचार नसेल ते माझ्यासाठी निरर्थक आहे असे तो म्हणायचा. गणिताची आवड असलेले उपजिल्हाधिकारी रामस्वामी अय्यर यांची भेट झाल्याने रामानुजन यांना जिल्हा मद्रास पोट ट्रस्टमध्ये कारकुनाची नोकरी मिळाली. तेथे आल्यानंतर शेशू अय्यर व नारायण अय्यर यांनी त्यांना खूप मदत केली. त्यांनी रामानुजन च्या गणिती संशोधनाला प्रोत्साहन दिले. त्यांनी रामानुजन यांना इंग्लंडचे सुप्रसिद्ध गणिती जी. एच. हार्डी यांना पत्र लिहिण्यास सांगितले. रामानुजन यांनी लिहिलेल्या पत्रामुळे हार्डी यांना खूप आनंद झाला. "गेल्या 1000 वर्षात भारताने जगाला दिलेली देणगी म्हणजे रामानुजन होय!" असे गौरव उद्गार त्यांनी काढले. त्यांनी रामानुजन यांना इंग्लंड येथे बोलावण्यासाठी खूप प्रयत्न केले. या प्रयत्नात ते यशस्वी झाले. दोघांनी मिळून गणितात भरपूर संशोधन केले. मात्र तेथील थंड वातावरण त्यांना मानवले नाही. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खाणे यामुळे अनेकदा त्यांना उपासमार सहन करावी लागली. त्यात ते आजारी पडले. त्यामुळे त्यांना भारतात परत यावे लागले.लंडनमध्ये जवळपास तीन वर्षाच्या काळात त्यांचे जीवन म्हणजे फक्त खोलीतील चार भिंती, त्यांचे काम आणि त्यांचे गणितातील सहकारी प्राध्यापक हार्डी एवढ्या पुरतेच मर्यादित होते. कधी कधी ते सलग तीस तास काम करायचे आणि मग थकवा आला की वीस तास झोप घ्यायचे. अती,ताण  ताणाव,आहाराकडे दुर्लक्ष करणे, अति मानसिक श्रम करणे, सूर्यप्रकाशाचा अभाव या सर्व कारणांमुळे रामानुजन यांना क्षयरोग झाला. या आजारावर त्यावेळी औषध नसल्याने तो असाध्य आजार बळावत गेला. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रामानुजन यांच्यावर लंडनमध्ये उपचार करण्यात आले होते. परंतु त्यांच्या हट्टी स्वभावामुळे ते उपचारांना दाद देत नव्हते. शेवटी त्यांना भारतात पाठवण्याचे ठरले.  

ज्या कल्पनांचा त्यावेळी नाही पण भविष्यात उपयोग होईल असे संशोधन त्यांनी केले. नवीन कल्पना मांडली. त्यामुळेच रामानुजन हे त्या काळातील थोर गणिती होते याची त्यांना जाण होती. पाश्चात्य गणिताची ओळख नसताना त्यांनी एकट्याने स्वतःचे संशोधन केले ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे. लंडन रॉयल सोसायटीने रामानुजन यांना फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला.

आपल्या शेवटच्या काळात त्यांनी मॉक थिटा फंक्शन चा शोध लावला. शेवटी 26 एप्रिल 1920 रोजी ते स्वर्गवासी झाले. गणिताचा हा महान संशोधक काळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षी गणिताचा प्रचंड मोठा खजिना जगाला प्रदान करून हा गणिती अनंताच्या प्रवासाला निघून गेला. त्यांच्या मृत्यूनंतर सापडलेल्या पेटीत जवळपास 100 पाने मिळाली या पानांमध्ये त्यांनी गणितातील 600 पेक्षा जास्त समीकरणे लिहिलेली होती. या समीकरणावर पुढे अनेकांनी आपले शोध प्रबंध लिहिले एका खेडेगावात जन्मलेल्या, गरीब कुटुंबात वाढलेल्या, परंपरागत गणिताचे ज्ञान घेतलेल्या मुलाने जगाला थक्क करून सोडणारे एवढे काम करून ठेवले ही खरोखर एक आश्चर्याची गोष्ट आहे.रामानुजन असंख्य गुढ गणिती सूत्रे आणि प्रमेय मागे टाकून गेले. त्याचे विश्लेषण आणि अभ्यास करायला अजूनही जगभरातले गणिततज्ञांचे ज्ञान कमी पडते आहे. रामानुजन यांचे गणित कळत नाही म्हणून त्या काळातील काही गणिती ओरड करत.मात्र त्यांचे काम काळाच्या किती पुढे होते हे आज त्यांच्या प्रश्नांची उकल करताना लक्षात येते. 1920 मध्ये आजारपणाच्या शेवटच्या काळात त्यांनी हार्डी यांना पाठवलेल्या पत्रात एक प्रमेय दिले होते. मात्र त्याची सिद्धता दिली नव्हती त्यानंतर लवकरच त्यांचा मृत्यू झाला ते प्रमेय तसेच सोडवायचे राहून गेले. जगभरातील कोणत्याही गणित तज्ञांना ते सोडवता आले नाही. त्यांच्या मृत्यू नंतर बऱ्याच दिवसांनी विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांच्या टीमला यश मिळाले. ते प्रमेय सुटत नसल्याने त्यावेळी ते बरोबर असावे की चूक यावर चर्चा होत होती. मात्र एवढ्या वर्षांनी कळले ते प्रमेय अतिशय महत्त्वाचे आहे. ते प्रमेय कृष्णविवराचे रहस्य सोडवायला उपयुक्त ठरणारे निघाले. त्यांनी मांडले तेव्हा कृष्णविवर या संकल्पनेचा शोध देखील लागलेला नव्हता.त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास 5000 हून अधिक प्रमेय प्रकाशित करण्यात आली. यातील कित्येक तर गणित तज्ञांना समजण्यास अनेक वर्ष लागतील अशी आहेत. रामानुजन यांनी त्यांच्या वही मध्ये लिहून ठेवलेल्या असंख्य प्रश्नावर आजही जगातील विविध ठिकाणी संशोधन व अभ्यास चालू आहे. अशा या अनंताच्या प्रवासाला निघालेला हा भारत मातेचा महान सुपुत्र भारतीय तरुणांना त्यांच्या महान कार्याची प्रेरणा नेहमीच देत राहील अशी आशा व्यक्त करूया.