डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

गुरुजींची ही कामे कधी कमी होणार?

 शिकवायचे कधी? इतर कामेच जास्त !

शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम पत्रकार  राम शिनगारे / लोकमत न्यूज नेटवर्क यांच्या लेखणीतून....

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु होऊन दीड महिनाच झाला आहे. या दीड महिन्यातच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चार चाचण्यांना सामोरे जावे लागले आहे. या संदर्भात अहवाल तयार करणे आणि तो अपलोड करणे यात शिक्षकांचाही प्रचंड वेळ जात आहे. या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक त्रासले असून, आता विरोध करू लागले आहेत.


दीड महिन्यात चार चाचण्या दीड महिन्यापूर्वी शाळा सुरु झाल्यानंतर १५ दिवसांत सेतू पूर्व चाचणी आणि सेतू उत्तर चाचणी घेण्याचे आदेश आले. त्यानंतर २ ते ४ ऑगस्ट दरम्यान दिशा उपक्रमांतर्गत चाचण्यांचे आदेश मिळाले. या चाचण्या घेऊन निकाल ऑनलाइन अपलोड होत नाही, तोच १७ व १८ ऑगस्टला पायाभूत चाचण्यांचे आदेश प्राप्त झाले. या सर्व उपक्रमांमुळे शिक्षकांना केवळ ५० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिकविण्यास मिळत असल्याचे वास्तव आहे.


गुरुजींची ही कामे कधी कमी होणार?




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: